तालुक्यात १ हजार ६२९ हत्तीरोग रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:31+5:30
नागभीड तालुक्याची एकूण लोकसंख्या एक लाख ३८ हजार ७९५ एवढी आहे. या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेत एकूण पात्र लोकसंख्या एक लाख ३० हजार ६५२ एवढी आहे. सदर मोहीम २ मार्च २०२० ते २० मार्च २०२० या कालावधीत राबविल्या जाणार आहे. ही मोहीम २६२ अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांच्या सहकार्याने चालत आहे.

तालुक्यात १ हजार ६२९ हत्तीरोग रूग्ण
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : येथील आरोग्य विभागाकडून २ मार्चपासून हत्तीरोग दुरीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. २० मार्चपर्यंत ही मोहीम चालणार असून तालुक्यात २६२ कर्मचारी, स्वयंसेवक ही मोहीम चालवत आहेत. नागभीड तालुक्यात एक हजार ६२९ हत्तीरोग रूग्ण असल्याची माहिती आहे.
नागभीड तालुक्याची एकूण लोकसंख्या एक लाख ३८ हजार ७९५ एवढी आहे. या हत्तीरोग दुरीकरण मोहिमेत एकूण पात्र लोकसंख्या एक लाख ३० हजार ६५२ एवढी आहे. सदर मोहीम २ मार्च २०२० ते २० मार्च २०२० या कालावधीत राबविल्या जाणार आहे. ही मोहीम २६२ अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांच्या सहकार्याने चालत आहे.
माहितीनुसार नागरिकांना प्रत्यक्षात गोळ्या वाटप करण्याचे काम २३६ लोकांकडून सुरू आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. गोळ्या वाटप करणाऱ्या या २३६ कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तालुका वैद्यकीय अधिकारी रोजचा अहवाल पाहत आहेत. याशिवाय नागभीड तालुक्यात नवेगाव पांडव, मौशी, बाळापूर, तळोधी व वाढोणा अशी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारीही या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील शिर्शस्थ अधिकारी व शिर्शस्थ पदाधिकाºयांना गोळ्यांचे वितरण करून या मोहिमेचा आरंभ करण्यात आला.
प्रतिबंधासाठी खबरदारी
प्रतिबंधात्मक उपायांमधे संपूर्ण समुदायाला सूक्ष्म अळ्या मरतील, अशी औषधे देणे, आणि डासांचे नियंत्रण करणे या गोष्टींचा समावेश आहे. डासांचे चावे टाळणे हाही प्रतिबंधाचा आणखी एक प्रकार आहे. हत्तीरोगाचे जंतू पसरवणारे डास हे सामान्यत: संध्याकाळी आणि पहाटे चावतात. हत्तीरोगाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी राहात असलेल्या नागरिकांनी मच्छरदाणी व कीटनाशक मारलेल्या मच्छरदाणीचा उपयोग करावा. संध्याकाळ ते पहाटेच्या दरम्यान उघडया त्वचेवर डास निवारक लावावे.