शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Agniveer Recruitment 2022: अग्निवीर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी, 8वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज, 5 ग्रेड्सवर होईल भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:55 IST

Agnipath Recruitment 2022, Agniveer Bharti Rally Notification: चार वर्षं नोकरी पूर्ण झाल्यानंतर, अग्निवीरांना सेवा निध‍ी पॅकेज, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आणि 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.

भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराने अग्निवीर रिक्रूटमेंट रॅली नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. जुलै 2022 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

या पदांसाठी होईल भरती - अग्निवीर जनरल ड्यूटीअग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/एम्‍यूनेशन)अग्निवीर क्‍लर्क/ स्‍टोअरकीपर टेक्निकलअग्निवीर ट्रेड्समन 10वी पासअग्निवीर ट्रेड्समन 8वी पास

किती असेल सॅलरी -जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, 4 वर्षांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. यादरम्यान दरवर्षी 30 दिवस सुट्टीही मिळेल. सर्विसच्या पहिल्यावर्षी 30,000/- रुपये एवढे वेतन आणि भत्‍ते, दुसऱ्या वर्षी 33,000/- रुपये एवढे वेतन आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी 36,500/- रुपये एवढे वेतन आणि भत्‍ते तसेच शेवटच्या आणि अखेरच्या वर्षीही 40,000/- हजार रुपये वेतन आणि भत्‍ते दिले जातील.

पदानुसार निर्धारित पात्रता -- जनरल ड्यूटी पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 10व्या वर्गात किमान 45 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. - टेक्निकल एव्हिएशन आणि एम्‍यूनेशन पदासाठी फिजिक्‍स, केमेस्‍ट्री, मॅथ्‍स आणि इंग्रजी विषयांत किमान 50 टक्के मार्कांसह 12वी पास होणे आवश्यक आहे.- क्‍लर्क/ स्‍टोअरकीपर पदांसाठी उमेदवार कुठल्याही शाखेतून किमान 60 टक्के मार्क घेऊन 12वी पास होणे आवश्यक आहे.  तसेच इंग्रजी आणि मॅथ्‍स मध्ये 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.- ट्रेड्समन पदांसाठी 10वी आणि 8वी पास उमेदवारांची वेग-वेगळी भरती केली जाईल. सर्व विषयांत 33 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. - सर्व पदांसाठी निर्धारित वयोमर्यादा 17.5 वर्ष ते 23 वर्ष एवढी असेल.

सर्व्हिसनंतर काय मिळणार? - चार वर्षं नोकरी पूर्ण झाल्यानंतर, अग्निवीरांना सेवा निध‍ी पॅकेज, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आणि 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. जो उमेदवार 10वी पास असेल, त्याला 4 वर्षांनंतर, 12वी समकक्ष पास सर्टिफिकेटदेखील मिळेल. यासंदर्भातील माहिती नंतर जारी केली जाईल. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकCentral Governmentकेंद्र सरकार