शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांचे कार्य दिपस्तंभासारखे : सानंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:24 IST

भैयुजी महाराजांचे कार्य हे दिपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. 

ठळक मुद्दे५ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डमध्ये भैयुजी महाराजांचा अस्थिकलश भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. महाराजांच्या चाहत्यांसाठी ऋषीसंकुल सजनपुरी येथे प.पु.भैयुजी महाराजांचे स्मृतीस्थळ बांधण्यात आले.

खामगांव : राष्ट्रसंत भैयुजी महाराज हे अध्यात्मिक गुरु होते. शेतक-यांना केंद्रबिंदु माणुन त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले. सत्संग,अध्यात्मासोबतच विज्ञानाची जोड घालुन त्यांनी हजारो शेतकरी, आदिवासी, युवक, महिला भगिणी यांचे जिवनमान  उंचाविले. त्यांचे व्यक्तीमत्व नेहमीच उर्जा प्रदान करणारे होते. भैयुजी महाराजांनी  आपल्या आयुष्यात सदैव सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. अनेकांना जिवन जगण्याचा मंत्र त्यांनी दिला. भैयुजी महाराजांचे कार्य हे दिपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. ५ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डमध्ये भैयुजी महाराजांचा अस्थिकलश भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती व सुर्योदय परिवाराच्या वतीने  आयोजित सामुहिक श्रध्दांजलीपर कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सभापती संतोष टाले, ऋषी संकुल आश्रमचे अध्यक्ष एन.टी.देशमुख, सुर्योदय परिवाराचे विर प्रतापजी थानवी, वल्लभरावजी देशमुख, सतीश राठी,विदर्भ कबडड्ी असो.चे अध्यक्ष अशोकबाप्पु देशमुख, देशमुख समाजउन्नती मंडळाचे अध्यक्ष संतोष देशमुख,पत्रकार प्रशांत देशमुख, दगडुजी सरदार, विवेक मोहता आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, शेतक-यांचा उध्दार करण्यासाठी भैयुजी महाराजांनी सौरउर्जा प्रकल्प, शेतक-यांना मोफत बियाणे, खत वाटप, वृक्षारोपण चळवळ यासारखे अनेक उपक्रम राबविले. खामगांव मतदार संघातील प्रत्येक विकासकामामध्ये भैयुजी महाराजांचा आशिर्वाद व त्यांची समर्थसाथ नेहमीच मिळाली. खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतक-यांसाठी अनेक कार्यक्रमात भैयुजी महाराजांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन व प्रबोधन केले. सर्व समाज बांधव एका झेंडयाखाली यावा  यासाठी  भैयुजी महाराजांनी ऋषीसंकुल सजनपुरी येथे अनेक वर्षे सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळयाचे यशस्वीरित्या आयोजन केले. भैयुजी महाराज जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले कार्य सदैव विधायक कायार्ची प्रेरणा देणारे आहे.महाराजांचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी सदैव सुर्योदय परिवाराच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. ऋषीसंकुल सजनपुरीचे अध्यक्ष एन.टी.देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भैयुजी महाराजांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले. भैयुजी महाराजांच्या प्रत्येक  उपक्रमाला सानंदा साहेबांनी समर्थ साथ दिली.  भैयुजी महाराज हे उपकाराची जाणीव ठेवणारे होते. भैयुजी महाराजांच्या आकस्मीक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे व्यक्तीमत्व आपण गमावले आहे.ऋषी संकुल सजनपुरी येथे महाराजांनी सुरु केलेले दत्त जयंती, नवरात्री, गुरु पोर्णिमा  हे उपक्रम आपण भविष्यातही सुरु ठेवणार आहोत. महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सुध्दा आयोजित करु.   महाराजांच्या चाहत्यांसाठी ऋषीसंकुल सजनपुरी येथे प.पु.भैयुजी महाराजांचे स्मृतीस्थळ बांधण्यात आले असुन येथे महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुर्योदय परिवाराच्या वतीने विर प्रताप थानवी, वल्लभरावजी देशमुख, कृ.उ.बा.स.च्या वतीने सभापती संतोष टाले यांनी, अडते व्यापारी असो.चे प्रतिनिधी म्हणुन विवेक मोहता यांनी, हमाल-मापारी संघटनेच्या वतीने दगडुजी सरदार यांनी तर पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार प्रशांत देशमुख यांनी प.पु.भैयुजी महाराजांना आपली भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

टॅग्स :khamgaonखामगावBhayyuji Maharajभय्यूजी महाराज