शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

येळगाव धरणात चार दलघमी पाणीसाठा:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 18:01 IST

बुलढाणा जिल्हा मुख्यालयाची पाण्याची चिंता मिटली.

बुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाºया बुलडाणा जिल्ह्यात २३ आणि २४ एप्रिल रोजी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाण्याच्या पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. दरम्यान सध्या उपलब्ध असलेले पाणी हे शहरास आणखी साडेतीन महिने पुरेल ऐवढा जलसाठा सध्या येळगाव धरणात उपब्ध झाला आहे.सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहरास येळगाव धरणावरून पाणीपुरवठा होता. मात्र प्रकल्पातील जलसाठा हा गेल्या वर्षीच्या अवर्षणामुळे मृतसाठ्यात गेला होता. त्यामुळे अवघा महिनाभर पाणी पुरेल, असा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात होता. त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठा हा गेल्या सहा वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे बुलडाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय असा प्रश्नही निर्माण होत होता. मधल्या काळात बुलडाणा शहरात मोठ्या प्रमाणावर अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रणकंद झाले होते. बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट जलशुद्धीकरण केंद्राची सफाई करून उपलब्ध पाणी हे शुद्ध स्वरुपात नागरिकांना मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात पालिका प्रशासनाच्या उदीसन धोरणासंदर्भात थेट बैठकीमध्येच ताशेरे ओढले होते. त्यासाठी सनियंत्रण समितीही नियुक्त केल्या गेली होती. तहसिलदार संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आली होती. मात्र प्रकल्पातील जलसाठा संपुष्टात आला तर काय? असा प्रश्न होता. शहरासाठी पेनटाकळी प्रकल्पावरही पाणी आरक्षण होते. पर्यायी जलवाहिनीही उपलब्ध होती. मात्र पेनटाकळी प्रकल्पातील पाणीसाठीही सहा वर्षाच्या तुलनेत निच्चांकी पातळीवर पोहोचला होता तर खडकपूर्णा प्रकल्प तीन वर्षापासून मृतसाठ्यात आहे. शहरात जवळपास १४ हजार नळ जोडण्या आहेत.या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात पावसाचे आगमनही झालेले नव्हेत. मात्र २३ आणि २४ जून रोजी येळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेला दमदार पाऊस आणि पैनंगगा पूनर्रूजिवन प्रकल्पामुळे झालेले नदीचे खोलीकरण यामुळे पहिल्या पावसातच पैनगंगा नदीला पुर गेला व येळगाव धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. वर्तमान स्थितीत प्रकल्पात चार दलघमी पाणीसाठा आहे. जवळपास तीन दलघमी पाणी या प्रकल्पात वाढले आहे. परिणामी आगामी साडेतीन महिने बुलडाणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.मृत साठ्यात असलेल्या येळगाव धरणात वर्तमान स्थितीत चार दलघमी पाणीसाठा झाला आहे. सुमारे साडेतीन महिने तो शहरास पुरेल.(राहूल मापारी, पाणीपुरवठा अभियंता, बुलडाणा पालिका)
टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण