शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाणीटंचाई कृती आराखडा १६ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:51 PM

Buldhana News यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील जवळपास ६० गावांना ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.

 लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  उन्हाळ्यात जिल्ह्यातील ६६७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा व त्यास लागणाऱ्या खर्चाचा अंदाज काढला आहे. या कृती आराखड्यास जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मान्यता दिली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील जवळपास ६० गावांना ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५२ टक्के गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ८२ टँकरची गरज पडणार असून, त्यावर सहा कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. यासोबतच ५३८ गावांत ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी दोन कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, १७३ गावांत नव्याने विंधन विहिरी घ्याव्या लागण्याची शक्यता असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे जवळपास ९४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. परतीच्या पावसानेही पिकांना फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यात टंचाई तुलनेने कमी जाणवण्याची शक्यता व्यक्त होत होती, मात्र या उपरही जिल्ह्यातील १२७२ आबाद गावांपैकी ६६७ अर्थात ५२ टक्के गावांत पाणीटंचाईची शक्यता कृती आराखड्यातून स्पष्ट होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई