पाणीटंचाई कृती आराखडा १६ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:51 PM2020-12-25T12:51:19+5:302020-12-25T12:51:45+5:30

Buldhana News यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील जवळपास ६० गावांना ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.

Water scarcity action plan of 16 crores | पाणीटंचाई कृती आराखडा १६ कोटींचा

पाणीटंचाई कृती आराखडा १६ कोटींचा

Next

 लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  उन्हाळ्यात जिल्ह्यातील ६६७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा व त्यास लागणाऱ्या खर्चाचा अंदाज काढला आहे. या कृती आराखड्यास जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मान्यता दिली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील जवळपास ६० गावांना ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात जिल्ह्यातील ५२ टक्के गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ८२ टँकरची गरज पडणार असून, त्यावर सहा कोटी ८४ लाख रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. यासोबतच ५३८ गावांत ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी दोन कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, १७३ गावांत नव्याने विंधन विहिरी घ्याव्या लागण्याची शक्यता असून, त्यासाठी एक कोटी २६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे जवळपास ९४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. परतीच्या पावसानेही पिकांना फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यात टंचाई तुलनेने कमी जाणवण्याची शक्यता व्यक्त होत होती, मात्र या उपरही जिल्ह्यातील १२७२ आबाद गावांपैकी ६६७ अर्थात ५२ टक्के गावांत पाणीटंचाईची शक्यता कृती आराखड्यातून स्पष्ट होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

Web Title: Water scarcity action plan of 16 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.