शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबरवा अभयारण्यात अस्वलाच्या हल्ल्यात दोन आदिवासी ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:51 IST

अंबाबारवा अभयारण्यात दोन आदिवासींवर अस्वलाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबारवा अभयारण्यात दोन आदिवासींवर अस्वलाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान अस्वलाची दोन पिल्लेही येथे मृतावस्थेत आढळल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील निमखेड येथील अशोक मोतीलाल रऊते आणि माना बंडू गवते आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत घरातील गुरेढोरे शोधण्यासाठी गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबाबरवा अभयारण्यात गेले होते.दरम्यान, अभयारण्यात गुरांचा शोध घेत असताना एका अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. एका आदिवासीने या अस्वलास हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वलाने त्याच्यावरही हल्ला करूनत्यास गंभीर जखमी केले. दोघेही अस्वलाने दोघांनाही गंभीर जखमी केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती गावातील काही व्यक्तींना कळाल्यानंतर त्यांनी व ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेमुळे अभयारण्यालगतच्या गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या या संपूर्ण प्रकाराची माहिती सोनाळा येथील वन्यजिव वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली. मात्र दुपारपर्र्यंत येथील एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. त्यामुळे दोन्ही आदिवासींचे मृतदेह घटनास्थळीच पडून होते. अखेर गुरूवारी दुपारी निमखेडी येथील हबू पवार याने सोनाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार कर्मचाºयांसह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत आदिवासींचे मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.दोन्ही आदिवाशींच्या पार्थिवाचे शवविच्छेदन वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन त्यांचे पार्थिव करण्यात आले.ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान घटनास्थळी अकोट वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी भेट देऊन पाहणी केली आहे.अस्वलाची दोन पिल्लेही मृतावस्थेतअकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक बेऊला, सहाय्यक वनसंरक्षण एल. ए. आवारे यांनी गुरूवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळानजीकच अस्वलाची आठ महिन्याची दोन पिल्ले मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता अस्वलाच्या हल्ल्यात दोन आदिवासी ठार झाल्याचे प्रकरण आता गंभीर स्वरुन धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृत पिल्लांचे शुक्रवारी शवविच्छेदन होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीवSangrampurसंग्रामपूरforestजंगल