शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

अंबाबरवा अभयारण्यात अस्वलाच्या हल्ल्यात दोन आदिवासी ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:51 IST

अंबाबारवा अभयारण्यात दोन आदिवासींवर अस्वलाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबारवा अभयारण्यात दोन आदिवासींवर अस्वलाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान अस्वलाची दोन पिल्लेही येथे मृतावस्थेत आढळल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील निमखेड येथील अशोक मोतीलाल रऊते आणि माना बंडू गवते आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत घरातील गुरेढोरे शोधण्यासाठी गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबाबरवा अभयारण्यात गेले होते.दरम्यान, अभयारण्यात गुरांचा शोध घेत असताना एका अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. एका आदिवासीने या अस्वलास हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वलाने त्याच्यावरही हल्ला करूनत्यास गंभीर जखमी केले. दोघेही अस्वलाने दोघांनाही गंभीर जखमी केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती गावातील काही व्यक्तींना कळाल्यानंतर त्यांनी व ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेमुळे अभयारण्यालगतच्या गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या या संपूर्ण प्रकाराची माहिती सोनाळा येथील वन्यजिव वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली. मात्र दुपारपर्र्यंत येथील एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. त्यामुळे दोन्ही आदिवासींचे मृतदेह घटनास्थळीच पडून होते. अखेर गुरूवारी दुपारी निमखेडी येथील हबू पवार याने सोनाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार कर्मचाºयांसह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत आदिवासींचे मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.दोन्ही आदिवाशींच्या पार्थिवाचे शवविच्छेदन वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन त्यांचे पार्थिव करण्यात आले.ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान घटनास्थळी अकोट वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी भेट देऊन पाहणी केली आहे.अस्वलाची दोन पिल्लेही मृतावस्थेतअकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक बेऊला, सहाय्यक वनसंरक्षण एल. ए. आवारे यांनी गुरूवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळानजीकच अस्वलाची आठ महिन्याची दोन पिल्ले मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता अस्वलाच्या हल्ल्यात दोन आदिवासी ठार झाल्याचे प्रकरण आता गंभीर स्वरुन धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृत पिल्लांचे शुक्रवारी शवविच्छेदन होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीवSangrampurसंग्रामपूरforestजंगल