शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अंबाबरवा अभयारण्यात अस्वलाच्या हल्ल्यात दोन आदिवासी ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:51 IST

अंबाबारवा अभयारण्यात दोन आदिवासींवर अस्वलाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबारवा अभयारण्यात दोन आदिवासींवर अस्वलाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान अस्वलाची दोन पिल्लेही येथे मृतावस्थेत आढळल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील निमखेड येथील अशोक मोतीलाल रऊते आणि माना बंडू गवते आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत घरातील गुरेढोरे शोधण्यासाठी गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबाबरवा अभयारण्यात गेले होते.दरम्यान, अभयारण्यात गुरांचा शोध घेत असताना एका अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. एका आदिवासीने या अस्वलास हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वलाने त्याच्यावरही हल्ला करूनत्यास गंभीर जखमी केले. दोघेही अस्वलाने दोघांनाही गंभीर जखमी केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती गावातील काही व्यक्तींना कळाल्यानंतर त्यांनी व ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेमुळे अभयारण्यालगतच्या गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या या संपूर्ण प्रकाराची माहिती सोनाळा येथील वन्यजिव वनपरिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली. मात्र दुपारपर्र्यंत येथील एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नव्हता. त्यामुळे दोन्ही आदिवासींचे मृतदेह घटनास्थळीच पडून होते. अखेर गुरूवारी दुपारी निमखेडी येथील हबू पवार याने सोनाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार कर्मचाºयांसह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत आदिवासींचे मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.दोन्ही आदिवाशींच्या पार्थिवाचे शवविच्छेदन वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन त्यांचे पार्थिव करण्यात आले.ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान घटनास्थळी अकोट वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी भेट देऊन पाहणी केली आहे.अस्वलाची दोन पिल्लेही मृतावस्थेतअकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक बेऊला, सहाय्यक वनसंरक्षण एल. ए. आवारे यांनी गुरूवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळानजीकच अस्वलाची आठ महिन्याची दोन पिल्ले मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता अस्वलाच्या हल्ल्यात दोन आदिवासी ठार झाल्याचे प्रकरण आता गंभीर स्वरुन धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृत पिल्लांचे शुक्रवारी शवविच्छेदन होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीवSangrampurसंग्रामपूरforestजंगल