शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

भरधाव कार पुलावरून कोसळली, दोन जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 22:01 IST

भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कोलासर जवळील पुलावर दुपारी ४ वाजता दरम्यान घडली.

 नांदुरा -  भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कोलासर जवळील पुलावर दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. जळगाव खा. येथील परिवारातील काही सदस्य मूर्तीजापूर येथे पारिवारिक कामानिमित्त गेले होते. दरम्यान, कार्यक्रम आटोपून जळगाव खानदेशकडे परतत असताना एमएच १९- बीजे ५६१४ या इंडिका कार चालकाचे वाहनावरून नियत्रंण सुटले. त्यामुळे ही कार पुलावरून ३० फूट खोल कोसळून झालेल्या अपघातात गाडीतील मागील सिटवरील सौ अलका वसंत नाले (५०) व सौ प्रांता अर्जुन कोळी ( ५२ ) या दोघी जागीच ठार झाल्या तर तर चालक अर्जुन कोळी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारार्थ खामगाव येथे हलविण्यात आले असून, याच  कार मधील वसंत नाले यांना किरकोळ मार लागला आहे.

कठडे नसल्याने घडला अपघात!महामार्गावरील ब-याच पुलांना कठड़े नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना नेमका अंदाज येत नाही. कोलासर जवळील या पुलाचेही कठड़े कधीचेच तूटलेले आहेत. राष्ट्रिय महामार्ग प्रशासनाकडे पुल जीर्ण झाल्याच्या तसेच कठडे नसल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र,   प्रशासनाच्या हलागर्जीपणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अपघातात वाढ झाली आहे. तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. 

 

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. जुन्या पुलांची दुरूस्ती तसेच वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर आहे.

- राकेश जवादे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूnewsबातम्या