शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कृषी सिंचनासाठी पाण्याचे यंदा आरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:58 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बुलडाणा: दुष्काळी स्थिती पाहता यावर्षी कृषी सिंचनासाठी पाणी न देण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले असून, प्रकल्पांमधील ३४ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, आगामी काळातील टंचाईची तीव्रता पाहता प्रसंगी अकोला, वाशिम व जळगाव खान्देश जिल्ह्यातून उपलब्धतेनुसार टँकरद्वारे पाणी आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन चाचपणी करीत आहे.दुसरीकडे कंडारी, विद्रुपा, व्याघ्रा, केशव शिवणी, धामणगाव देशमुख, शिवणी आरमाळ येथील प्रकल्पात पाणीच उपलब्ध नसल्याने लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता पाहत ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणाहून संबंधित गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. उपरोक्त प्रकल्पात पाणीच उपलब्ध नसल्याने संबंधित गावातील पाणी आरक्षणाचाही पेच निर्माण झालेला आहे. नांदुरा, सिंदखेड राजा, मोताळा तालुक्यातील हे प्रकल्प असून, पाणी उपलब्ध नसल्याने येथील पाणी आरक्षण मंजूर करता आलेले नाही.ज्ञानगंगा प्रकल्पातून खामगाव एमआयडीसी आणि अकोला जिल्ह्यातील दोन गावांसाठी नदीपात्र तथा कॅनॉलद्वारे सोडण्यात येणारे पाणी यंदा मात्र अभूतपूर्व टंचाईची शक्यता पाहता सोडण्यात येणार नसल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती