शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कृषी सिंचनासाठी पाण्याचे यंदा आरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:58 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बुलडाणा: दुष्काळी स्थिती पाहता यावर्षी कृषी सिंचनासाठी पाणी न देण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले असून, प्रकल्पांमधील ३४ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, आगामी काळातील टंचाईची तीव्रता पाहता प्रसंगी अकोला, वाशिम व जळगाव खान्देश जिल्ह्यातून उपलब्धतेनुसार टँकरद्वारे पाणी आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन चाचपणी करीत आहे.दुसरीकडे कंडारी, विद्रुपा, व्याघ्रा, केशव शिवणी, धामणगाव देशमुख, शिवणी आरमाळ येथील प्रकल्पात पाणीच उपलब्ध नसल्याने लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता पाहत ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणाहून संबंधित गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. उपरोक्त प्रकल्पात पाणीच उपलब्ध नसल्याने संबंधित गावातील पाणी आरक्षणाचाही पेच निर्माण झालेला आहे. नांदुरा, सिंदखेड राजा, मोताळा तालुक्यातील हे प्रकल्प असून, पाणी उपलब्ध नसल्याने येथील पाणी आरक्षण मंजूर करता आलेले नाही.ज्ञानगंगा प्रकल्पातून खामगाव एमआयडीसी आणि अकोला जिल्ह्यातील दोन गावांसाठी नदीपात्र तथा कॅनॉलद्वारे सोडण्यात येणारे पाणी यंदा मात्र अभूतपूर्व टंचाईची शक्यता पाहता सोडण्यात येणार नसल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती