शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; संपत्तीच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या!

By सदानंद सिरसाट | Updated: July 22, 2024 15:53 IST

आरोपीसह त्याच्या मित्राला अटक.

(सदानंद सिरसाट : खामगाव, जि. बुलढाणा)संग्रामपूर-वरवट बकाल : वान नदीपात्रात पाच दिवसांपूर्वी कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले आहे. संपत्तीचा हिस्सा नावावर करून देत नसल्याच्या वादातून मुलाने त्याच्या मित्रासह वडिलांची हत्या केल्याचे उघड झाल्याने जामोद येथील रहिवासी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर, मृत अशोक विष्णू मिसाळ (५०) असून, अकोला जिल्ह्यातील, तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील रहिवासी आहे.

संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावालगत दक्षिण दिशेला वाननदी पात्रातील एका खड्ड्यात अनोळखी मृतदेह १६ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आढळून आला होता. तामगाव पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून पाचव्या दिवशी रविवारी या प्रकरणाचे रहस्य उलगडले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृत अशोक मिसाळ १३ जुलै रोजी दानापूर येथे घरात झोपेत असताना, रात्री मुलगा व त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दानापूर येथून दुचाकीने वान नदी पात्रातील एका खड्ड्यात रेती मिश्रीत दगडांनी बुजवून ठेवला. तिसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तपास करीत दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा तामगाव पोलिस ठाण्यात कलम १०३ (१), २३८ भा. न्या. संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तामगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे, विलास बोपटे, बिट जमादार अशोक वावगे, रामकिसन माळी, प्रमोद मुळे, विकास गव्हाड, संतोष मेहेंगे, संतोष आखरे यांनी केली.संपत्तीच्या हिश्शासाठी घडले हत्याकांडवडिलांकडे संपत्तीचा हिस्सा नावावर करून देण्याची मागणी नेहमी आरोपी मुलाकडून होत होती. मात्र, मृतकाने संपत्ती नावावर करून दिली नसल्याच्या कारणावरून मुलाने हा प्रकार केला. याप्रकरणी जामोद येथील आरोपी मुलगा प्रमोद उर्फ शुभम अशोक मिसाळ (२४), त्याचा मित्र राहुल रामदास दाते (२५) या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुलगा आल्यानंतर वडील गायबशनिवारी दुपारी आरोपी प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ हा वडिलांच्या भेटीसाठी आला होता. रात्रभर अशोक मिसाळ यांच्यासोबत होता. दुसऱ्या दिवशी कोणालाही काही न सांगता परस्पर जामोद येथे निघून गेला, तेव्हापासूनच अशोक मिसाळ हेसुद्धा गायब झाल्याची माहिती पुढे आली.

२० वर्षांपासून होते वेगळेअशोक मिसाळ हे त्यांची पत्नी व मुलापासून गेल्या २० वर्षांपासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांच्या नावावर असलेली जमीन व प्लॉट हे त्यांची पत्नी व मुलाच्या नावावर करून देत नव्हते, तसेच त्याची परस्पर विक्री करीत होते. याबाबत मुलगा प्रवीण हा दानापूर गाठून वडिलांशी वाद घालत होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी