शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

संग्रामपुरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 11:16 IST

पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले.

संग्रामपूर - पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी (20 ऑक्टोबर) सकाळी 8.30 वाजता रास्तारोको करण्यात आला. 

आता शांत बसायचे नाही, सरकारच्या मानगुटीवर बसून सोयाबीन कापसाची नुकसान भरपाई घेऊ असे आवाहन करीत 20 ऑक्टोबर रोजी चक्काजाम आंदोलनात ताकदीने रस्त्यावर उतरा असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना केले होते. त्या अनुषंगाने आज वरवट बकाल येथे बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संघटीत होऊन दुध व ऊसाला भाव मिळवून घेतला. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही. कारण इथला शेतकरी संघटीत नाही. दुसरीकडे भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला नुकसान भरपाई व जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, सोयाबीन कापसाला हमीभाव जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई दया या बरोबरच तुर, उडीद व हरभऱ्याचे चुकारे तातडीने दया, ऑनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी जे शेतकरी पिकविमा भरु शकले नाही त्यांना 50 टक्के मिकविम्याची रक्क्म दया अशा विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आजचे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

शेतकरी विरोधी असलेल्या या भाजपा सरकारचे कमळ 2019 ला औषधालाही ठेवू नका असे आवाहनही रविकांत तुपकर यांनी यावेळी केले. आंदोलनात शेतकऱ्यांनी बैलजोडी, सोयाबीन, कापूस रस्त्यावर टाकून निषेध केला तसेच टायर जाळण्यात आले. यावेळी युवकांनी वाहन अडवण्यात आले. या आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर,युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष राहूल मारोडे तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, जळगाव जा. तालुका अध्यक्ष नितीन पाचपोर, योगेश मुरूख, रोषण देशमुख,सागर खानझोडे, रामेश्वर घाटे, गणेश वहितकर, गजानन आमझरे, विलास तराळे, राजू उमाळे, भगवान तायडे, मोहन पाटील यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनbuldhanaबुलडाणा