शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानातून दोन वर्षांपासून साखर गायब!

By admin | Updated: April 18, 2017 00:55 IST

गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळणे दुरापास्त

किशोर मापारी - लोणार धान्य घोटाळ्याने प्रसिद्धीच्या झोतात राहत असलेल्या तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था अद्यापही सुधरायला तयार नाही. धान्य बेपत्ता होत असून, तालुक्यातील दुकानांना जोडलेल्या गावांमध्ये कधी धान्य वितरण होते, हा संशोधनाचा विषय आहे. गत दोन वर्षांपासून तालुक्यातून साखर हद्दपार झाल्याचे दिसून येते. या प्रकारावर कुणाचाही अंकुश नसल्याने गोरगरीब धान्यापासून वंचित राहात आहेत.तालुक्यात ३३ हजार ३१४ रेशन कार्डधारक आहे. या रेशनकार्डधारकांना ९६ दुकानांमधून स्वस्त धान्याची वितरण प्रणाली आहे. यामध्ये एपीएल शेतकरी ७५९१, एपीएल प्राधान्य ५७१८, बीपीएल ९६२०, अंत्योदय ६४२७, स्पेशल एपीएल ३६४१, शुभ्र १९३ आणि अन्नपूर्णा १२४ रेशनकार्डधारक आहेत. एपीएल शेतकरी, एपीएल प्राधान्य रेशनकार्डधारकांना गहू , तांदूळ तर बीपीएल व अंत्योदयधारकांना गहू, तांदूळ, साखर वाटप करणे बंधनकारक असताना कधी गहू तर कधी तांदूळ यावरच रेशनकार्डधारकांना भागवावे लागत आहे. यामध्ये साखर तर हद्दपारच झाली आहे. धान्य वितरण प्रणालीमध्ये सुधारणा केली असली तरी त्यामध्येही थोडेफार धान्य गावात पाठविले जाते आणि इतर धान्य काळ्या बाजारात विकले जाते. नेमके धान्य वितरणासाठी कधी येते आणि कोण वितरित करतो, हे कळत नाही. धान्य वितरणासाठी आल्यानंतर ग्रामपंचायतला सूचना देऊन दवंडी देणे गरजेचे आहे किंवा काही नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविणे गरजेचे आहे; मात्र असा कोणताही प्रकार होत नाही. दुपारच्या वेळी मजूर आणि शेतकरी शेतात गेल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेऊन येतात आणि वितरण केल्याचा देखावा करतात. याबाबत अनेकांनी तहसील व पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु कोणतीही उपाययोजना झालेली नाही. जि. प. व पं.स. निवडणुकी दरम्यान अधिकारी वर्ग निवडणुकीत गुंतला असताना तालुक्यातील ९० टक्के दुकानदारांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगुरबांचा तोंडचा घास काळ्या बाजारात नेऊन विकला आहे. यामध्ये लोणार गोदाम पालक यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केली आहे. अन्न धान्य घेण्यासाठी गेलेल्या अनेकांना माल आलाच नाही, अशी भूलथाप दुकानदाराकडून दिली जाते. यामध्ये तालुक्यातील अधिकारी यांचे संगनमत असल्यामुळे कोणत्याही दुकानदारांवर कारवाई केल्या जात नाही. ‘ना खाऊंगा ना खाणे दूंगा’ असे ब्रीद वाक्य विद्यमान सरकारचे असतानाही हा घोटाळा थांबवावा, अशी मागणी राजेश मापारी यांनी अन्न पुरवठा ग्राहक सरंक्षण मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. गोरगरिबांना अन्न मिळावे, यासाठी योजना सुरु केल्या आहेत; परंतु काही अधिकारी आर्थिक हितासाठी योजनेला तिलांजली देत असून, गरिबांच्या तोंडचा घास हिसकावून घेत आहेत. रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळालेच पाहिजे.- राजेश मापारी, जि.प.सदस्य, लोणार.धान्य वितरणमध्ये घोटाळा झाल्याबाबत कोणतीही कल्पना नाही. सदर तक्रारीबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.- ए. एफ. सय्यद , पुरवठा निरीक्षण अधिकारी,लोणार.