शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

 सोयाबीन सडले: तिन एकर शेतात चारावी लागली मेंढरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 18:29 IST

ढोरपगाव येथील एका शेतकºयाला नाईलाजाने तीन एकर शेतात मेंढरं चारावे लागल्याची परिस्थिती आहे.

ढोरपगाव: यावर्षी गत महिन्यात झालेल्या अति पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील सोयाबीन सडले. त्यामुळे मातीतून सोने उगविण्याऐवजी शेतीचे पडीक जमिनीत रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यातूनच ढोरपगाव येथील एका शेतकºयाला नाईलाजाने तीन एकर शेतात मेंढरं चारावे लागल्याची परिस्थिती आहे.सततच्या पावसाने गत महिन्यात थैमान घातले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरूच होता. यामुळे ऐन कापणीला आलेल्या सोयाबीनची माती झाली. ढोरपगाव येथील शेतकरी श्रीकांत अविनाश तांगडे यांच्या तीन एकरातील सोयाबीनचेही असेच हाल झाले. यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने मातीतून सोने उगवेल, अशी आशा असतानाच, उभ्या सोयाबीनचं मातेर झालं आहे. काही शेतकºयांच्या शेतातून सोयाबीनची काढणी झाली, मात्र पावसामुळे कुजलेले सोयाबीन कुणीही विकत घ्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट आले आहे. ऐन कापणीच्या काळातच पावसाने कहर केल्याने ढोरपगाव परिसरातील शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. ज्वारी, कापूस उत्पादक शेतकºयांचीही हीच अवस्था आहे. मालाची प्रतवारी प्रचंड घसरल्याने व्यापारी अगदी अत्यल्प भावाने शेतामाल खरेदी करून घेत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीकरीता आणणेही शेतकºयांना परवडेनासे झाले आहे. दरम्यान एवढ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना, केवळ हेक्टरी ८ हजार रूपये एवढी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरल्या गेल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)

 रब्बीच्या हंगामाची सोय नाही!खरीपाचा हंगाम हातून गेल्याने निदान रब्बीचा हंगाम तरी चांगला जाण्याची चिन्हे आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हरभरा पेरणीचे शेतकºयांचे नियोजन होते, परंतु खरीपाची पिके हातून गेल्याने शेतकºयांकडे रब्बीच्या हंगामासाठी पैसा नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी