शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 3:30 PM

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

- अजहर अली लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.गत दहा ते बारा दिवसापासून वरून राजा रुसून बसल्याने हजारो हेक्टरवरील पेरण्या करपण्याची दाट शक्यता आहे. सद्यास्थिती पेरणी झालेली पिके उगवली असुन तापमाणात वाढ झाल्याने सोपटत आहेत. पिकांना पाणि न मिळाल्यास उगवलेली पिके करपतील या मुळे येथिल शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गंभिर स्वरूपाच्या दुष्काळाने आर्थिक संकटात सापडलेल्या दुष्काळ ग्रस्त शेतकय्रांसाठी पावसाने दडी मारल्याने दुष्काळात तेरावा महीना उगवला. संग्रामपूर तालुक्यातील ४४ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावर दर वर्षी खरीप पिकींची लागवड करण्यात येते.सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले दुथळी भरून वाहु लागले. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यावर्षी पावसाळा चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले होते.शेतकºयांनी शेतीत विविध पिकांची लागवड केली. तालुक्यात एकुण ३६ हजार ४६० हेक्टरवरील क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये ३११ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली. मका ८८२ हेक्टर, तुर १ हजार ६५९ हेक्टर, मुग ६८३ हेक्टर, उडीद ५५९ हेक्टर, सोयाबिन ११ हजार ७३०, तर कपाशी पिकाची २० हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असुन सर्व पिके पाण्याअभावी धोक्यात आली असल्याचे विदारक चित्र आहे. गत पाच वर्षापासून संग्रामपुर तालुक्यात निर्सगाच्या लहरीपणामुळे शेती पिकांचे मोठ्यीप्रमाणात नुकसान होत असल्याने शेती घाट्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थीक कोंडी झालेली दिसून येते. खरिप हंगामात बँकांनी पिक कर्ज व कर्जाचे पुर्नगठन करण्यास नकार घंटा दिल्याने शेतकºयांनी सावकारांचे उंबरठे झिजवत कर्ज काढुन हंगामी पिकांची पेरणी केली.परंतु पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात पावसाचे लवकर आगमन न झाल्यास हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे बळीराजा व्यथीत झाला आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी