शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

राजकारणाला दातृत्वाची अशीही जोड; तुपकरांनी कृतीतून जोपासली सामाजिक बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:35 IST

‘यामुळेच... तुपकरांचं नेतृत्व... काळजात घर करतं’, अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरतेय. तिची शहानिशा केली असता, रविकांत तुपकर यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देणारा किस्सा समोर आला आहे.

बुलडाणा: आक्रमक राजकारणी तथा आंदोलन फेम स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देणारा किस्सा समोर आला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कुटुंबाचे छत्र हरपलेल्या तीन मुलांच्या पालनपोषणासोबतच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही ते आपला कामचा व्याप सांभाळून तितक्याच तत्परतेने करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या फेसबुकवर ‘ यामुळेच... तुपकरांचं नेतृत्व... काळजात घर करतं’, अशी पोस्ट फिरत असून या पोस्टची शहानिशा केली असता या आक्रमक राजकारणी व्यक्तिमत्वाच्या मनातील संवेदनशीलतेची किनार स्पष्ट झाली.

सुमारे पाच ते सात वर्षापूर्वी शेगाव तालुक्यातील खिरोडा पुलावरून बस नदीत कोसळून १९ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यात मच्छिंद्रखेड येथील मोलमजुरी करणाऱ्या कैलास भारंबे व त्यांच्या पत्नीचाही समावेश होता. मात्र काळाने झडप घातलेल्या या दांपत्याचे तीन मुले त्यामुळे अनाथ झाली होती तर त्यांची वयोवृद्ध आजी बघून गहिवरलेल्या तुपकरांनी तीनही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. तीनही मुलांच्या निकटवर्तीयांना त्याची कल्पना देत पत्नी शर्वरीचेही समर्थन घेत वैष्णवी, श्रेया आणि चेतन या तीन मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली. आज वैष्णवी नगर येथील त्रिमुर्ती पब्लीक स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकते तर चेतन बुलडाण्यातील राजीव गांधी मिल्ट्रीस्कूलमध्ये आठव्या वर्गात असून श्रेया ही शेगाव येथे सहाव्या वर्गात आहे.

या तीनही बच्चे कंपनीचे विश्वच आता रविकांत तुपकर झाले आहे. योगायोगाने दहा जानेवारी रोजी नगर जिल्ह्यात आंदोलनासाठी गेलेल्या तुपकरांची आणि मानसपुत्री असलेल्या वैष्णवीची त्रिमुर्ती पब्लीक स्कूलमध्ये भेट झाली आणि महिन्यानंतर भेटणाऱ्या या ‘बाप-लेकींच्या’ डोळ्यांच्या कडा आपसूकच पाणावल्या. त्यावेळी आक्रमक राजकारण्याच्या संवेदनशील ह्रदयाची कल्पना आली. आणि फेसबुकवर या प्रसंगाचे एक छायाचित्र व काही मजकूर सोलापूर जिल्ह्यातील रणजीत बागल या एका समर्थकाने पोस्ट केला. तेव्हा राजकारण्याचे ह्रदयही इतके संवेदनशील असते याचा परिचय आला. या तीनही दत्तक पाल्यांना तुपकर हे दर महिन्याला भेट देऊन त्यांची ख्याली, खुशाली जानून घेतात. सर्वात मोठी वैष्णवी ही तल्लख असून गणीतामध्ये आऊट ऑफ मार्क ती घेते. सनदी अधिकारी बनण्याचे तीचे स्वप्न आहे. या संदर्भाने तुपकरांशी संपर्क साधला असता ‘आपण आपल काम करत जाव’ ऐवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणाSocialसामाजिक