शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राजकारणाला दातृत्वाची अशीही जोड; तुपकरांनी कृतीतून जोपासली सामाजिक बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:35 IST

‘यामुळेच... तुपकरांचं नेतृत्व... काळजात घर करतं’, अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरतेय. तिची शहानिशा केली असता, रविकांत तुपकर यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देणारा किस्सा समोर आला आहे.

बुलडाणा: आक्रमक राजकारणी तथा आंदोलन फेम स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देणारा किस्सा समोर आला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कुटुंबाचे छत्र हरपलेल्या तीन मुलांच्या पालनपोषणासोबतच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही ते आपला कामचा व्याप सांभाळून तितक्याच तत्परतेने करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या फेसबुकवर ‘ यामुळेच... तुपकरांचं नेतृत्व... काळजात घर करतं’, अशी पोस्ट फिरत असून या पोस्टची शहानिशा केली असता या आक्रमक राजकारणी व्यक्तिमत्वाच्या मनातील संवेदनशीलतेची किनार स्पष्ट झाली.

सुमारे पाच ते सात वर्षापूर्वी शेगाव तालुक्यातील खिरोडा पुलावरून बस नदीत कोसळून १९ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यात मच्छिंद्रखेड येथील मोलमजुरी करणाऱ्या कैलास भारंबे व त्यांच्या पत्नीचाही समावेश होता. मात्र काळाने झडप घातलेल्या या दांपत्याचे तीन मुले त्यामुळे अनाथ झाली होती तर त्यांची वयोवृद्ध आजी बघून गहिवरलेल्या तुपकरांनी तीनही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. तीनही मुलांच्या निकटवर्तीयांना त्याची कल्पना देत पत्नी शर्वरीचेही समर्थन घेत वैष्णवी, श्रेया आणि चेतन या तीन मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली. आज वैष्णवी नगर येथील त्रिमुर्ती पब्लीक स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकते तर चेतन बुलडाण्यातील राजीव गांधी मिल्ट्रीस्कूलमध्ये आठव्या वर्गात असून श्रेया ही शेगाव येथे सहाव्या वर्गात आहे.

या तीनही बच्चे कंपनीचे विश्वच आता रविकांत तुपकर झाले आहे. योगायोगाने दहा जानेवारी रोजी नगर जिल्ह्यात आंदोलनासाठी गेलेल्या तुपकरांची आणि मानसपुत्री असलेल्या वैष्णवीची त्रिमुर्ती पब्लीक स्कूलमध्ये भेट झाली आणि महिन्यानंतर भेटणाऱ्या या ‘बाप-लेकींच्या’ डोळ्यांच्या कडा आपसूकच पाणावल्या. त्यावेळी आक्रमक राजकारण्याच्या संवेदनशील ह्रदयाची कल्पना आली. आणि फेसबुकवर या प्रसंगाचे एक छायाचित्र व काही मजकूर सोलापूर जिल्ह्यातील रणजीत बागल या एका समर्थकाने पोस्ट केला. तेव्हा राजकारण्याचे ह्रदयही इतके संवेदनशील असते याचा परिचय आला. या तीनही दत्तक पाल्यांना तुपकर हे दर महिन्याला भेट देऊन त्यांची ख्याली, खुशाली जानून घेतात. सर्वात मोठी वैष्णवी ही तल्लख असून गणीतामध्ये आऊट ऑफ मार्क ती घेते. सनदी अधिकारी बनण्याचे तीचे स्वप्न आहे. या संदर्भाने तुपकरांशी संपर्क साधला असता ‘आपण आपल काम करत जाव’ ऐवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणाSocialसामाजिक