शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा; सुबोध सावजी यांची मागणी

By ब्रह्मानंद जाधव | Updated: November 2, 2023 16:56 IST

राज्यात १०० टक्के जनजीवन विस्कळीत होऊन न भूतो न भविष्यती संपत्तीची हानी होत असल्याचे सावजी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 

डोणगाव : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्रातील सर्व जातिधर्माच्या वतीने विनंती केल्याचे नमूद आहे. महाराष्ट्रातील शासनाचे अपयश, निष्क्रियता, बेजबाबदारपणा याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील शांतता, सुव्यवस्था ढासळत जात आहे व ढासळलेली आहे. मराठा समाजाच्या जातप्रमाणपत्राकरिता राज्यात आत्महत्येचे फार मोठे सत्र सुरू झाले आहे. तसेच राज्यात १०० टक्के जनजीवन विस्कळीत होऊन न भूतो न भविष्यती संपत्तीची हानी होत असल्याचे सावजी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 

आपला या मागणीकरिता सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय राज्यकर्ते सर्व जातिधर्माचे महिला-पुरुष, तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पाहिली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा समाजाच्या जातप्रमाणपत्राचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSubodh Savjiसुबोध सावजी