शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील ‘सालवन’ प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 5:06 PM

संग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा  प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे.

ठळक मुद्देसंग्रामपूर तालुक्यातील १९ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. तालुक्यात जलसंधारणाची एकूण १०४ कामे विविध गावांत करण्यात आली. आदिवासी गाव सालवन तसेच संग्रामपूर तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा  प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे. काकोडा गावाचा दुसरा तर रूधाना गावाला तृतीय क्रमांक मिळाला. यामुळे आदिवासी गाव सालवन तसेच संग्रामपूर तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.  या स्पर्धेचा निकाल १२ आॅगस्ट रोजी पुणे येथील कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सिने अभिनेता अमिरखान, पत्नी किरण राव, गिरीश कुळकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते सालवनचे रेमू डावर यांना प्रथम पुरस्काराचे प्रमाण देण्यात आले. यावेळी गावातील शांताबाई चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होत्या.  संग्रामपूर तालुक्यातील १९ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. तालुक्यात जलसंधारणाची एकूण १०४ कामे विविध गावांत करण्यात आली. कुडामातीचे घर असलेल्या रेमू डावर व राजेश चव्हाण, जागेश कच्छवार, शांताताई चव्हाण व ज्योती भिलावेकर यांनी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेवून गावातील आदिवासी बांधवांना श्रमदान करण्यास प्रोत्साहीत केले. दररोज येथे ६० ते ७० नागरिक श्रमदान करत होते. विशेष म्हणजे २३ एप्रील रोजी आमिर खान व किरण यांनी सालवन गावाला भेट देऊन गावकºयांसोबत काम केले होते. दरम्यान सालवन गावाला त्यांच्या कष्टाचे फळ  मिळाले असून सालवन गावाने प्रथम क्रमांक पटकावला.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा