शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

‘स्वच्छ भारत’ मोहिमेसाठी प्रशासनाची धावपळ; २२ गावात स्वच्छतेचा ‘जागर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 6:35 PM

बुलडाणा : ग्राम स्वराज अभियानअंतर्गंत गरिब कुटुंबियांची सर्वात जास्त असलेल्या जिल्ह्यातील २२ गावामध्ये स्वच्छ भारत दिवस निमित्त स्वच्छतेचा जागर करण्यात आला.

ठळक मुद्देसंबंधित पंचायत समितीला जिल्हा परिषद प्रशासनाकडून एक दिवस सूचना देण्यात आल्याने तसेच १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीय असल्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून आले. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ५ मे २०१८ पर्यंत जिल्ह्यात ग्राम स्वराज्य अभियान राबवण्यात येणार आहे. अभियान राबवण्यासाठी जिल्ह्यातील गरीब कुटुंबांची संख्या जास्त असलेल्या २२ गावांची निवड करण्यात आली आहे.

बुलडाणा : ग्राम स्वराज अभियानअंतर्गंत गरिब कुटुंबियांची सर्वात जास्त असलेल्या जिल्ह्यातील २२ गावामध्ये स्वच्छ भारत दिवस निमित्त स्वच्छतेचा जागर करण्यात आला. या अभियानअंतर्गंत संबंधित पंचायत समितीला जिल्हा परिषद प्रशासनाकडून एक दिवस सूचना देण्यात आल्याने तसेच १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीय असल्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून आले. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ५ मे २०१८ पर्यंत जिल्ह्यात ग्राम स्वराज्य अभियान राबवण्यात येणार आहे. अभियान राबवण्यासाठी जिल्ह्यातील गरीब कुटुंबांची संख्या जास्त असलेल्या २२ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये प्रभावीपणे हे अभियान राबवण्यात यावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी दिल्या आहेत. या अभियानामध्ये १८ एप्रिल रोजी स्वच्छ भारत दिवस, २० एप्रिल रोजी उज्ज्वला दिवस, २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत दिवस, २८ एप्रिल रोजी ग्राम स्वराज्य दिवस, ३० एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस, २ मे रोजी किसान कल्याण दिवस व ५ मे रोजी आजीविका दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच २४ एप्रिल पर्यंत पोषण अभियान राबवण्यात येत आहे. दरम्यान २४ एप्रिल रोजी निवडलेल्या गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असून या विशेष ग्रामसभेमध्ये पंचायत दिनाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या योजना, अटल पेन्शन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, प्रधानमंत्री पिक विमा योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, आम आदमी बिमा योजना आदींची माहिती देण्यात येणार आहे.

  या गावात राबविण्यात आले स्वच्छता अभियान

ग्राम स्वराज्य अभियानासाठी जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड, पाळोदी, तरोडा कसबा, नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा धांडे, दहीवडी, मलकापूर तालुक्यातील बहापूरा, खामगाव तालुक्यातील पोरज, लोखंडा, पळशी खु, बोरी, आसा, मेहकर तालुक्यातील थार फदार्पूर, मारोतीपेठ, उमरा, बुलडाणा तालुक्यातील साखळी खु, चिखला, देऊळगांव राजा तालुक्यातील सावंगी टेकाडे, बोराखेडी बावरा, सिंदखेडराजा तालुक्यातील मोहाडी, गोरेगाव, राजेगांव, सोयंदेव या गावांची निवड करण्यात आली असून संबंधित पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

 चिखला येथे स्वच्छ भारत दिनाचे उद्घाटन

बुलडाणा पंचायत समितीअंतर्गंत चिखला व साखळी खु. या गावांचा स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गंत निवड करण्यात आली. त्यापैकी चिखला येथे १८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता स्वच्छ भारत दिनाचे उद्घाटन सरपंच मिराताई मुकेश वाघ, उपसरपंच परमेश्वर इंगळे, ग्रामपंचायत सदस्य पवन भरत वाघ, गिरीष सुरेश वाघ, अर्चना दिलीप वाघ, स्वाती गणेश वाघ, मिरा विजय सुरूशे, लक्ष्मी तुळशीदास इंगळे, विस्तार अधिकारी डि.एम.जाधव, ग्रामपंचायत सचिव गणेश भोंडे व चिखला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान