शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी नियमांचा गळफास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:01 IST

बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या  आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या  आहेत.  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्याभोवती मदतीसाठी नियम व अटींचा गळफास घातल्याने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १८६ कुटुंब मदतीविना आहेत.पीक-पाणी बदलले की, शेतकºयांच्या अर्थचक्रात बदल होतो. जिल्ह्यातील शेतकºयांसमोर वारंवार अडचणींचा डोंगर कायम राहत आहे. शेतकºयांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर मात करून शेतकºयांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे; परंतू या संघर्षापुढेही हात टेकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळतात. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आणि आत्महत्येचा हा प्रवास सुरूच आहे. प्रशासन केवळ पंचनामा करून शासनदप्तरी नोंद घेण्यातच धन्यता मानतात. शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची मदत देण्यात येते. मात्र, यामध्येही नियम व अटींमुळे ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत ३४१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्यांपैकी १८६ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. सात हजार १०५ प्रकरण मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, त्यापैकी १२७ प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात मदत देण्यात आली. तर २८ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विविध अटींच्या नावावर आत्महत्याग्रस्त शेतकºयांचे कुटुंब शासकीय मदतीपासून वंचीत राहत असल्याची गंभीर स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

२८ प्रकरणे प्रलंबीतजानेवारी २०१८ पासून आजपर्यंत १२७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना मदत देण्यात आली आहे. तर २८ शेतकरी आत्महत्या सरकारी मदतीसाठी चौकशीवर प्रलंबीत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

अपात्र प्रकरणांची कारणेआत्महत्येच्या प्राथमिक चौकशीत दिलेल्या कारणांवरून शेतकरी आत्महत्या सरकारी मदतीस पात्र आहे की नाही, ते ठरविण्यात येते. शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्यानंतरच कुटुंबाला आर्थिक मदत दिल्या जाते. मात्र जिल्ह्यातील १८६ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून त्यामध्ये अपात्र प्रकरणांची कारणेही वेगवेगळी दाखविण्यात आली आहेत. त्यात घरघुती भांडण, व्यसनाधिनता व इतर कारणे पुढे करण्यात आली आहेत. 

शासन दरबारी नापिकी नव्हे, कर्जबाजारीपणा  दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवर किडींचे आक्रमण यासारख्या अनेक कारणांमुळे सततची नापिकी होत असते. त्यात वाढलेला उत्पादन खर्च, शेतमालाला अत्यल्प भाव यामुळेही शेतकरी आत्महत्यांचा मार्ग निवडतात. परंतू जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्या नापिकीने नव्हे, तर कर्जबाजारीपणामुळे झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडे नमुद आहे.  जानेवारी २०१८ ते आजपर्यंतचे चित्रशेतकरी आत्महत्या          ३४१मदतीसाठी पात्र          १२७मदतीसाठी अपात्र         १८६चौकशीसाठी प्रलंबीत     २८

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या