शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी नियमांचा गळफास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:01 IST

बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या  आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या  आहेत.  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्याभोवती मदतीसाठी नियम व अटींचा गळफास घातल्याने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १८६ कुटुंब मदतीविना आहेत.पीक-पाणी बदलले की, शेतकºयांच्या अर्थचक्रात बदल होतो. जिल्ह्यातील शेतकºयांसमोर वारंवार अडचणींचा डोंगर कायम राहत आहे. शेतकºयांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर मात करून शेतकºयांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे; परंतू या संघर्षापुढेही हात टेकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळतात. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आणि आत्महत्येचा हा प्रवास सुरूच आहे. प्रशासन केवळ पंचनामा करून शासनदप्तरी नोंद घेण्यातच धन्यता मानतात. शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एक लाखाची मदत देण्यात येते. मात्र, यामध्येही नियम व अटींमुळे ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत ३४१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या आत्महत्यांपैकी १८६ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. सात हजार १०५ प्रकरण मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, त्यापैकी १२७ प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात मदत देण्यात आली. तर २८ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित आहेत. विविध अटींच्या नावावर आत्महत्याग्रस्त शेतकºयांचे कुटुंब शासकीय मदतीपासून वंचीत राहत असल्याची गंभीर स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

२८ प्रकरणे प्रलंबीतजानेवारी २०१८ पासून आजपर्यंत १२७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना मदत देण्यात आली आहे. तर २८ शेतकरी आत्महत्या सरकारी मदतीसाठी चौकशीवर प्रलंबीत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

अपात्र प्रकरणांची कारणेआत्महत्येच्या प्राथमिक चौकशीत दिलेल्या कारणांवरून शेतकरी आत्महत्या सरकारी मदतीस पात्र आहे की नाही, ते ठरविण्यात येते. शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्यानंतरच कुटुंबाला आर्थिक मदत दिल्या जाते. मात्र जिल्ह्यातील १८६ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या असून त्यामध्ये अपात्र प्रकरणांची कारणेही वेगवेगळी दाखविण्यात आली आहेत. त्यात घरघुती भांडण, व्यसनाधिनता व इतर कारणे पुढे करण्यात आली आहेत. 

शासन दरबारी नापिकी नव्हे, कर्जबाजारीपणा  दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवर किडींचे आक्रमण यासारख्या अनेक कारणांमुळे सततची नापिकी होत असते. त्यात वाढलेला उत्पादन खर्च, शेतमालाला अत्यल्प भाव यामुळेही शेतकरी आत्महत्यांचा मार्ग निवडतात. परंतू जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्या नापिकीने नव्हे, तर कर्जबाजारीपणामुळे झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडे नमुद आहे.  जानेवारी २०१८ ते आजपर्यंतचे चित्रशेतकरी आत्महत्या          ३४१मदतीसाठी पात्र          १२७मदतीसाठी अपात्र         १८६चौकशीसाठी प्रलंबीत     २८

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या