शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रब्बी हंगामात तूट भरून काढण्याची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:26 IST

लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे.

ठळक मुद्दे४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी १ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन 

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आतापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली  असून, त्यांच्यासमोर खरीप हंगामातील तूट भरून काढण्याचे आव्हान आहे.  त्यानुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले असून, १ लाख ३६ हजार मेट्रिक टन ख तही रब्बीसाठी उपलब्ध आहे.जिल्ह्यात रब्बीचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.  त्यापैकी ४१  टक्केपेक्षा जास्त म्हणजे ५५ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी  झाली. यासाठी १ लाख  ३६ हजार ५00 टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यात रब्बी  हंगामात  ज्वारी, मका, गहू ही पिके घेतली जातात. परतीच्या पावसामुळे शे तकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, रब्बीच्या पेर्‍यात वाढ होण्याची शक्यता  आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी त्याने मोठी ओढ  दिलेली होती. परतीच्या पावसाने जमिनीत ओल व विहिरीत समाधानकारक पाणी  आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या रब्बीची अपेक्षा आहे. सध्या पेरणी सुरू असून, सरत्या  आठवड्यापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त पेरणी झाली. सर्वांत जास्त पेरणी चिखली  तालुक्यात १७ हजार ३७४ हेक्टरवर करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यात  १0 हजार ९९५, जळगाव जामोद तालुक्यात ५00, संग्रामपूर २ हजार ५२५,  देऊळगाव राजा ३ हजार ९00, मेहकर २ हजार ६९४, सिंदखेड राजा ४ हजार  ८७४, लोणार ७ हजार ३२४, खामगाव ३ हजार ६0५, शेगाव ३४0, मलकापूर  ५७0, मोताळा १0६ व नांदूरा तालुक्यात २७0 हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात  आली आहे. रब्बी हंगामातील उत्पादन जास्तीत जास्त वाढण्यासाठी शेतकरी प्रय त्नशील  असल्याचे दिसून येत आहे. 

रब्बी हंगामासाठी पुरेशी रासायनिक खते उपलब्धयावर्षी रब्बीच्या पेर्‍याच्या अंदाजानुसार बियाणे व खतांच्या मागणीचा अहवाल  शासनाला एक महिन्यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. त्यादृष्टीने ८0 हजार २६  मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. तर शासनाकडून  एकूण १ लाख ३६ हजार ५00 मेट्रिक टन खताची उपलब्धता करून देण्यात आली  आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाची तूट असल्यामुळे खताचा साठा शिल्लक हो ता. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात मागणीपेक्षा जास्त म्हणजे एकूण १ लाख ३६  हजार ५00 मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध आहेत. त्यात युरिया ३१ हजार  मेट्रिक टन, डीएपी १८ हजार ७00 मेट्रिक टन, एमओपी ६ हजार मेट्रिक टन व इ तर खतांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेती