शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

रब्बी हंगामात तूट भरून काढण्याची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:26 IST

लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे.

ठळक मुद्दे४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी १ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन 

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आतापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली  असून, त्यांच्यासमोर खरीप हंगामातील तूट भरून काढण्याचे आव्हान आहे.  त्यानुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले असून, १ लाख ३६ हजार मेट्रिक टन ख तही रब्बीसाठी उपलब्ध आहे.जिल्ह्यात रब्बीचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.  त्यापैकी ४१  टक्केपेक्षा जास्त म्हणजे ५५ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी  झाली. यासाठी १ लाख  ३६ हजार ५00 टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यात रब्बी  हंगामात  ज्वारी, मका, गहू ही पिके घेतली जातात. परतीच्या पावसामुळे शे तकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, रब्बीच्या पेर्‍यात वाढ होण्याची शक्यता  आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी त्याने मोठी ओढ  दिलेली होती. परतीच्या पावसाने जमिनीत ओल व विहिरीत समाधानकारक पाणी  आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या रब्बीची अपेक्षा आहे. सध्या पेरणी सुरू असून, सरत्या  आठवड्यापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त पेरणी झाली. सर्वांत जास्त पेरणी चिखली  तालुक्यात १७ हजार ३७४ हेक्टरवर करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यात  १0 हजार ९९५, जळगाव जामोद तालुक्यात ५00, संग्रामपूर २ हजार ५२५,  देऊळगाव राजा ३ हजार ९00, मेहकर २ हजार ६९४, सिंदखेड राजा ४ हजार  ८७४, लोणार ७ हजार ३२४, खामगाव ३ हजार ६0५, शेगाव ३४0, मलकापूर  ५७0, मोताळा १0६ व नांदूरा तालुक्यात २७0 हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात  आली आहे. रब्बी हंगामातील उत्पादन जास्तीत जास्त वाढण्यासाठी शेतकरी प्रय त्नशील  असल्याचे दिसून येत आहे. 

रब्बी हंगामासाठी पुरेशी रासायनिक खते उपलब्धयावर्षी रब्बीच्या पेर्‍याच्या अंदाजानुसार बियाणे व खतांच्या मागणीचा अहवाल  शासनाला एक महिन्यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. त्यादृष्टीने ८0 हजार २६  मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. तर शासनाकडून  एकूण १ लाख ३६ हजार ५00 मेट्रिक टन खताची उपलब्धता करून देण्यात आली  आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाची तूट असल्यामुळे खताचा साठा शिल्लक हो ता. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात मागणीपेक्षा जास्त म्हणजे एकूण १ लाख ३६  हजार ५00 मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध आहेत. त्यात युरिया ३१ हजार  मेट्रिक टन, डीएपी १८ हजार ७00 मेट्रिक टन, एमओपी ६ हजार मेट्रिक टन व इ तर खतांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेती