शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय ऊर्जा ठरतेय वरदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 02:30 IST

वर्षाला सहा हजार मेगावॉट निर्मिती

बुलडाणा : राज्यात विजेची वारंवार निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता, अक्षय ऊर्जा स्रोताचा वीज निर्मितीसाठी वापर, हे राज्यासाठी वरदान ठरले आहे, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात स्थापित करण्यात आलेल्या अक्षय ऊर्जा निर्मिती संचयनीद्वारे २0१६-१७ या वर्षामध्ये मध्ये ६ हजार ९७८ मेगावॉट वीज निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती राज्य शासनाच्या २0१६-१७ या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे.पवन, सौर, जैविक, बायोगॅस, सागरी लाटा, भू-औष्णिक आदी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अक्षय उज्रेचे स्रोत आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेस ऊर्जा संवर्धन कायदा २00१ च्या तरतुदीचे समन्वयन, विनियमन व अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केले आहे. अक्षय ऊर्जा प्रसार व विकास आणि ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांची अंमलबजावणी यासाठी महाऊर्जा सक्रिय आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर अक्षय ऊर्जा स्रोतांमधून १0 टक्के वीज खरेदीचे उद्दिष्ट गाठण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मितीसाठी धोरणे व प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. अक्षय ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेनुसार अक्षय ऊर्जा प्रकल्पात राज्यात यावर्षी ६ हजार ९७८ मेगावॉट क्षमतेची वीज निर्मिती होत आहे.