शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:20 IST

बुलडाणा :  सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.   जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू,  डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे.  योजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे. ही योजना राज्यात ३0 जिल्ह्यांतील २८७ तालु क्यांमधील १५0७ महसूल मंडळांत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेळी, पेरू, डाळिंब फळपिकांसाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरयोजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू,  डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे.  योजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे. ही योजना राज्यात ३0 जिल्ह्यांतील २८७ तालु क्यांमधील १५0७ महसूल मंडळांत राबविण्यात येणार आहे.ही योजना कर्जदार शेतकर्‍यांना सक्तीची असून, बिगर कर्जदार  शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. योजना चार समूहांमध्ये राबविण्यात  येणार आहे. समूह एकमध्ये इफको टोकियो जनरल इन्श्युरन्स कंपनी  लिमिटेड, समूह दोन व तीनमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल  इन्श्युरन्स कंपनी व समूह चारमध्ये बजाज अलायन्झ जनरल  इन्श्युरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना  विमा हप्ता दर संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदश्री दर  यापैकी कमी असलेली रक्कम शेतकर्‍यांनी भरावयाची आहे.  उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार  आहे.  आंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळिंब या पाच फळ िपकांसाठी शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे ३१ ऑक्टोबरपर्यंं त सादर करावयाचे आहे. तसेच द्राक्ष फळपिकाकरिता १५ ऑ क्टोबर, लिंबूकरिता १४ नोव्हेंबर, आंबा फळ पिकासाठी ३१  डिसेंबर, तर संत्रा व काजू फळपिकाकरिता ३0 नोव्हेंबरपर्यंंत  प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत. योजनेनुसार कमी जास् त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आद्र्रता या हवामान  धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकर्‍यांना विमा  संरक्षण आणि आर्थिक साहाय्य देण्यात येते. शेतकर्‍यांनी जास् तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक,  कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी  व संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, शेतकर्‍यांनी अंतिम  मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत  सहभागी व्हावे, असे आवाहन  कृषी विभागाने केले  आहे.