शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:20 IST

बुलडाणा :  सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.   जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू,  डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे.  योजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे. ही योजना राज्यात ३0 जिल्ह्यांतील २८७ तालु क्यांमधील १५0७ महसूल मंडळांत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेळी, पेरू, डाळिंब फळपिकांसाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरयोजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू,  डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे.  योजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे. ही योजना राज्यात ३0 जिल्ह्यांतील २८७ तालु क्यांमधील १५0७ महसूल मंडळांत राबविण्यात येणार आहे.ही योजना कर्जदार शेतकर्‍यांना सक्तीची असून, बिगर कर्जदार  शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. योजना चार समूहांमध्ये राबविण्यात  येणार आहे. समूह एकमध्ये इफको टोकियो जनरल इन्श्युरन्स कंपनी  लिमिटेड, समूह दोन व तीनमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल  इन्श्युरन्स कंपनी व समूह चारमध्ये बजाज अलायन्झ जनरल  इन्श्युरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना  विमा हप्ता दर संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदश्री दर  यापैकी कमी असलेली रक्कम शेतकर्‍यांनी भरावयाची आहे.  उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार  आहे.  आंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळिंब या पाच फळ िपकांसाठी शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे ३१ ऑक्टोबरपर्यंं त सादर करावयाचे आहे. तसेच द्राक्ष फळपिकाकरिता १५ ऑ क्टोबर, लिंबूकरिता १४ नोव्हेंबर, आंबा फळ पिकासाठी ३१  डिसेंबर, तर संत्रा व काजू फळपिकाकरिता ३0 नोव्हेंबरपर्यंंत  प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत. योजनेनुसार कमी जास् त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आद्र्रता या हवामान  धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकर्‍यांना विमा  संरक्षण आणि आर्थिक साहाय्य देण्यात येते. शेतकर्‍यांनी जास् तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक,  कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी  व संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, शेतकर्‍यांनी अंतिम  मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत  सहभागी व्हावे, असे आवाहन  कृषी विभागाने केले  आहे.