शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:20 IST

बुलडाणा :  सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.   जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू,  डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे.  योजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे. ही योजना राज्यात ३0 जिल्ह्यांतील २८७ तालु क्यांमधील १५0७ महसूल मंडळांत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेळी, पेरू, डाळिंब फळपिकांसाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरयोजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू,  डाळिंब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे.  योजनेंतर्गत फळपीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर  केलेली आहे. ही योजना राज्यात ३0 जिल्ह्यांतील २८७ तालु क्यांमधील १५0७ महसूल मंडळांत राबविण्यात येणार आहे.ही योजना कर्जदार शेतकर्‍यांना सक्तीची असून, बिगर कर्जदार  शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. योजना चार समूहांमध्ये राबविण्यात  येणार आहे. समूह एकमध्ये इफको टोकियो जनरल इन्श्युरन्स कंपनी  लिमिटेड, समूह दोन व तीनमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल  इन्श्युरन्स कंपनी व समूह चारमध्ये बजाज अलायन्झ जनरल  इन्श्युरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना  विमा हप्ता दर संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदश्री दर  यापैकी कमी असलेली रक्कम शेतकर्‍यांनी भरावयाची आहे.  उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार  आहे.  आंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळिंब या पाच फळ िपकांसाठी शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे ३१ ऑक्टोबरपर्यंं त सादर करावयाचे आहे. तसेच द्राक्ष फळपिकाकरिता १५ ऑ क्टोबर, लिंबूकरिता १४ नोव्हेंबर, आंबा फळ पिकासाठी ३१  डिसेंबर, तर संत्रा व काजू फळपिकाकरिता ३0 नोव्हेंबरपर्यंंत  प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत. योजनेनुसार कमी जास् त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आद्र्रता या हवामान  धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकर्‍यांना विमा  संरक्षण आणि आर्थिक साहाय्य देण्यात येते. शेतकर्‍यांनी जास् तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक,  कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी  व संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, शेतकर्‍यांनी अंतिम  मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत  सहभागी व्हावे, असे आवाहन  कृषी विभागाने केले  आहे.