शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पावसाने दडी मारल्याने पिके सुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

सोनोशी : गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने साेयाबीनसह सर्वच पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमाेर दुबार पेरणीचे संकट ...

सोनोशी : गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने साेयाबीनसह सर्वच पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमाेर दुबार पेरणीचे संकट आहे. शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत देण्याची मागणी हाेत आहे.

साेनाेशी परिसरात मृग नक्षत्रात पावसाचे आगमन लांबले. त्यामुळे पेरण्या लांबल्याने आहे त्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर शेतीला पूरक असा पाऊस पडला. पिके काही प्रमाणात उगवलीही. मात्र, त्यानंतर पावसाने सलग पंधरा दिवस दडी मारल्याने कोवळी असलेली कोमे आता सुकून वाळायला लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणी मिळालेली नाहीत. उसनवारी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. आधी महागाई व नंतर अस्मानी संकट यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बहुतांश करून शेतकऱ्यांची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. दाेन ते तीन दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

पीक कर्जही मिळेना

सलग दुसऱ्या वर्षी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची अपेक्षा हाेती. पीक कर्ज मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली. मात्र, पीक कर्जही मिळत नसल्याने चित्र आहे. त्यातच दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़