शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 3:15 PM

२०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला २१ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात गटशिक्षणाधिकारी स्तरावर आरटीई अंतर्गत येणाऱ्या जुन्या शाळा व नोंदणी झालेल्या नवीन शाळांची पडताळणी आजपासून करण्यात येत आहे. या पडताळणीसाठी व शाळांच्या नोंदणीसाठी ६ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.बालाकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनिमयानुसार खाजगी विनआनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेला २१ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. २०१९-२० या वर्षी नोंदणी झालेल्या आरटीई २५ टक्के पात्र शाळांचे आपोआप नोंदणी करणे, तसेच या सर्व शाळांची गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पडताळणी करण्याची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात सुरू झाली आहे. त्यासाठी स्थलांतरीत शाळा, नव्याने अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेल्या शाळा, अल्पसंख्यांक शाळा विचारात घेऊन ही कार्यवाही करण्यात येत आहे. ही प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये एकाचवेळी राबविण्यात येत आहे. पात्र खाजगी विना अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक यांनी याबाबत पालकांना सुचीत करणे बंधनकारक आहे. सर्व प्रथम आरटीई प्रवेश पात्र शाहांनी इयत्ता पहिलीचा डेटा सरल पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच २०२०-२१ करीता नोंदणीची प्रक्रिया मुदतीत पूर्ण करता येणार आहे. अन्यथा आरटीई पोर्टलवर नोंदणी व पडताळणी करताना आरटीई २५ टक्के जागा अपडेट करता येणार नाही. २०२०-२१ या वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने समावेश करावयाच्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.यावर्षी एकाच टप्प्यात प्रवेशाची लॉटरीयावर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी तीन टप्प्याऐवजी एकाच टप्प्यात प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे. शाळेत रिक्त जागांएवढीच प्रतीक्षा यादी तयार करून अनुक्रमे प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी प्रसिद्ध करण्यात येवून याबाबत पालकाचे रजिस्टर क्रमांकावर सुद्धा संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या एकंदरीत प्रक्रियेकडे आतापासूनच पालकवर्गाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत तीन ते चार टप्प्यात ही प्रक्रिया होत होती.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाbuldhanaबुलडाणा