शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाअभावी कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:39 IST

Buldhana news मुख्य कालवे, अंतर्गत पाट, सऱ्यांच्या देखभालीसह निरीक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असताना ५७ कर्मचाऱ्यांवर हा डोलारा उभा आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात तीन मोठे, सहा मध्यम व ८१ लघू प्रकल्प आहेत.४९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेथे प्रत्यक्षात २१८ कर्मचारीच कार्यरत आहेत.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली असता पाटबंधारे विभागाच्या सिंचन शाखेंतर्गत तब्बल ५६ टक्के पदे रिक्त असल्याने सिंचन सुविधांचा प्रत्यक्ष लाभ देण्यासोबतच कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्थापित सिंचन क्षमता महत्तम पातळीवर उपयोगात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात तीन मोठे, सहा मध्यम व ८१ लघू प्रकल्प आहेत. याप्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचनासाठी प्राधान्य दिले जाते; मात्र यासाठी या विभागाकडे आवश्यक असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याच कमी असल्याने समस्या निर्माण होत आहे. जेथे ४९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेथे प्रत्यक्षात २१८ कर्मचारीच कार्यरत आहेत तर ७५३ किमी लांबीच्या मुख्य कालवे, अंतर्गत पाट, सऱ्यांच्या देखभालीसह निरीक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असताना ५७ कर्मचाऱ्यांवर हा डोलारा उभा आहे. वास्तविक टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी दिले जाते. त्यानुषंगाने प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली, कालवा चौकीदार या पदांची आवश्यकता आहे; मात्र ही पदेच रिक्त असल्याने समस्या आहेत. त्यामुळे यंदा पाण्याची उपलब्धता असूनही प्रत्यक्ष सिंचनासाठी त्याचा कितपत उपयोग होतो, असा प्रश्न आहे. पेनटाकळी प्रकल्पावरील कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला.

प्रकल्प हस्तांतरणाबाबतही अडचणपेनटाकाळी प्रकल्पाचा कालवा फुटल्यानंतर या प्रकल्पाच्या हस्तांतरणासंदर्भातही बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागामध्ये काही अडचणी असल्याचे समोर येत आहे. २००१ आणि २००८ च्या परिपत्रकाचा संदर्भ त्यास आहे. पेनटाकळी प्रकल्पही अद्याप निर्माणाधीन आहे. त्याची एक सुप्रमाही सध्या प्रलंबित आहे. तसेच प्रकल्पातून अद्याप महत्तमस्तरावर  सिंचन सुरू झालेले  नाही. १०० हेक्टर सिंचन निर्मिती अद्यापही बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकल्पावरून महत्तमस्तरावर १४,३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होऊ शकते. सध्या ती १४,२३२ हेक्टरपर्यंत निर्माण झाली आहे.

पाच शाखांमध्ये पदभरती नाहीपेनटाकळी संदर्भाने उपविभागांतर्गत पाच शाखा कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र त्या ठिकाणी आवश्यक असलेली पदभरती झालेली नाही. दप्तर कारकून, मोजणीदार, शिपाई, कालवा चौकीदार, कालवा निरीक्षकांसह अन्य अशी जवळपास ११० पदे येथे रिक्त आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या मेहकर तालुक्यातील ही स्थिती असेल तर अन्य तालुक्यांचा विचार न केलेला बरा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प