शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पलसिद्ध महास्वामी स्मृती महोत्सव उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात - सिद्धलिंग शिवाचार्य महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 6:29 PM

मठाधीपती म्हणून ४० वर्षापासून कामकाज पाहत असलेले शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी साधलेला संवाद...

- अशोक इंगळे

साखरखेर्डा: श्री पलसिद्ध महास्वामी यांचा स्मृती सोहळा साखरखेर्डा येथे १८ आॅगस्ट पासून तीन दिवस आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यानुषंगाने येथील मठाधीपती म्हणून ४० वर्षापासून कामकाज पाहत असलेले शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी साधलेला संवाद...

 श्री पलसिद्ध महास्वामींचे साखरखेर्डा येथे आगमन कसे झाले ?

- कर्नाटकमधील बिदर प्रांताचे राजे जयसिंग यांच्या प्रदेशात दुष्काळ पडला होता. साधु संतांना पाऊस पाडण्यासाठी अधिष्ठानासाठी त्यावेळी बसविण्यात आले. पण पाऊस पडला नाही. त्यामुळे साधु संतांना तुरूंगात डांबण्यात आले होते. त्याची वार्ता जगद्गुरू मरुळसिद्ध शिवाचार्य यांना कळाल्याने त्यांनी दक्षीणेकडे कुच करत बिदर गाठले व अनुष्ठाण सुरू केले. त्याला प्रसन्न होत वरूण राजाने सात दिवस पाऊस पाडला. त्यानंतर कर्नाटकमधील उजैनी येथे पीठ स्थापना करून विरशैव धर्माचा प्रसार भारत भ्रमण करीत त्यांनी खेटकपूर गाठले.

पलसिद्ध नाव कसे रुढ झाले?

- खेटकपूर अभयारण्यात महास्वांनी तपश्चर्या केली. वय वाढल्याने पुढील प्रवास शक्य नव्हता. त्यामुळे मरूळसिद्ध महास्वामींनी एका गुहेत प्रवेश करून पळसाच्या वृक्षाखाली समाधी घेतली. स.न. ९८० मधील तो काळ होता. पळसाच्या वृक्षाखाली ते समाधीस्त झाल्याने मरुळसिद्ध यांचे नावाचे पलसिद्ध महास्वामी म्हणून रुढ झाले. बिदर प्रांतात त्यांना मळी (पाऊस पाडणारे) स्वामी म्हणून ओखळल्या जाते. मठाच्या गादीवर किती महापुरुष होऊन गेले? मठाची स्थापना झाल्यापासून सुमारे ३० स्वामींनी गादीवर बसून मठाचा कारभार पाहिला.सोबतच धर्म प्रसाराचे काम केले. विरशैव धर्म हा पुरातन धर्म आहे. सर्वांशी समन्वय ठेवून जातीभेद विरहीत विरशैव लिंगायत धर्म कार्यरत आहे. विरशैव धर्म कोणत्याही धर्माचा विरोध करत नाही. विरशैव धर्म पुरातन आहे. सर्व धर्मांचा सन्मान आम्ही करतो. साखरखेर्डा गावाचे पूर्वीचे नाव खेटकपूर असे होते. खेटकासूर नावाचा राक्षस येथे वास्तव्याला होता. अशी अख्यायिका आहे. त्यावरून या गावाचे नाव खेटकपूर पडले होते. संस्थांनच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून तसे प्रयत्न सुरू आहेत.

मठाच्या विकासासाठी काही ठोस निर्णय आहेत का?

- मठाचा विकास येथे शैक्षणिक, आरोग्य तथा पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास होऊ शकतो. त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. या संस्थांनला आता ब वर्गाचा दर्जा मिळाला असून विकास कामे सुरू आहेत. हा दर्जा मिळाल्यामुळे भक्त निवास, शौचालयांची सुविधा, धार्मिक कार्यासाठी सभागृह, भोजन मंडप, पाकगृह अशी विविध कामे येथे झाली आहे. येथे पर्यटन स्थळ विकसीत झाले तर साखरखेर्डा गावाचा आर्थिक विकास होईल. संस्थांनाला ब वर्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे विकासाची प्रक्रिया सुरू होऊन येथे सुविधा उपलब्ध होत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत