शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आरटीईचे अर्ज भरण्यासाठी पालकांची धावाधाव;  उरला एकच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:34 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे.

बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी पालकांच्या हातात शेवटचा एकच दिवस उरला आहे. विविध कागदपत्र वेळेवर न मिळाल्याने अर्ज भरण्यासाठी पालकांची सध्या धावाधाव होत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखिव ठेवण्याची तरतूद आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीतील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ५ मार्चपासून २३ मार्चपर्यंत पलाकांना आॅनलाईन अर्ज करण्याकरीता मुदत देण्यात आली होती. मात्र अर्ज भरण्यास अनेक अडचणी आल्याने काही पालक मुदतीमध्ये अर्ज करू शकले नाही. त्यामुळे अर्ज भरण्याच्या  कालावधीत ३० मार्चपर्यंत वाढ करण्यात आली. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरला आहे. परंतू आतापर्यंत पालकांना लागणारे विविध कागदपत्र वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. निवडणूकांच्या तोंडावर कागदपत्र मिळविणे पालकांसाठी अवघड झालेले आहे. त्यामुळे काही पालकांचे अर्ज भरणे बाकी आहे.  निवडणुकीच्या कामामुळे अडकले आवश्यक कागदपत्रआरटीई अंतर्गत प्रवेशासाठी रहिवासाचा वास्तवाचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग अयल्यास तसे प्रमाणपत्र, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला यासारखे विविध कागदपत्र आवश्यक आहेत. मात्र हे कागदपत्र मिळविण्यासाठी पालकांची दमछाक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याने सर्वसामान्यांना लागणारी कागदपत्र ते देण्यासाठी चालढकल करताना दिसून येतात. त्यामुळे अनेक पालकांचे आवश्यक कागदपत्र केवळ निवडणुकीच्या कामामुळे अडकले आहेत. परिणामी ते आपल्या पाल्याचा अर्जही भरू शकले नाही.संकेतस्थळ ‘हँग’आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने अनेक पालक सध्या अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर आहेत. अर्ज वाढल्याने संबंधीत संकेतस्थळच ‘हँग’ होत आहे. इंटरनेट सेवा अगदी संथगतीने चालत असल्याने एक अर्जासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे काही पालक रात्रीच्या वेळेतही अर्ज भरत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा