शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

वान धरणात केवळ ३१ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 10:40 AM

Only 31% water storage in Wan Dam : हनुमान सागर धरणात २९ जूनपर्यंत ३१.८२ टक्के पाणी असून, दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर :  अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात २९ जूनपर्यंत ३१.८२ टक्के पाणी असून, दिवसेंदिवस धरणातील जलसाठ्यात घट होत आहे. यंदा पावसाळा सुरू होऊन तीन आठवड्याच्या वर कालावधी निघून गेला, तरीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. आतापर्यंत धरण क्षेत्रात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २९ जून, २०२० रोजी धरणात तब्बल ४१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणातील जलसाठ्यात १० टक्क्यांनी घट झाली. लवकर धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हनुमान सागर धरणावरून अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपाणपट्ट्यातील संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्या जलसाठ्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात लवकर समाधानकारक पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यात कपातीची वेळ येऊ शकते. वान नदी पात्रात उभारण्यात आलेल्या हनुमान सागर धरणावर शेकडो गावांतील लाखो नागरिकांची तहान अवलंबून आहे. या धरणावर वीजनिर्मिती संच कार्यान्वित असून, त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलोवॅट आहे. दरवर्षी १ किलोवॅट वीजनिर्मिती येथे करण्यात येते. या वर्षी मात्र धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने वीजनिर्मिती संच बंदच आहे. मध्य प्रदेशातून उगम असलेली वान नदी सातपुडा पर्वत रांगेतून येत असल्याने, या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पाऊस पडल्यास, या धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होते. पावसाळा सुरू होऊन बराच कालावधी उलटून गेला,  पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणात पाण्याची आवक घटत आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पSangrampurसंग्रामपूरTelharaतेल्हारा