शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

दीड हजार कुटुंब करणार ‘कन्या वन समृद्धी’तून वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 17:35 IST

योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील १ हजार ५०२ शेतकरी कुटुंबांनी या योजनेचा लाभासाठी अर्ज केलेले आहेत.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल त्या दाम्पत्याने मुलीच्या नावे शासनाच्या मदतीने १० वृक्षांची लागवड करण्याचा उद्देशाने ‘कन्या वन समृध्दी योजना’ सुरू केली आहे. योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील १ हजार ५०२ शेतकरी कुटुंबांनी या योजनेचा लाभासाठी अर्ज केलेले आहेत. या पावसाळ्यात या कुटुंबांना वृक्षांचे वाटप केले जाणार आहे. भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करण्यासाठी वन विभागाकडून नवनवीन योजना नियमितपणे राबविण्यात येत आहेत. या योजनोंमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी सामान्य लोकांच्या सामाजिक गरजांचे भान ठेवून योजना तयार केल्या जातात. वैश्विक तापमान वाढीचे संकट, त्यामुळे निसर्गामध्ये झालेले फेरबदल, नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेली वाढ, वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन आणि जैवसृष्टीची स्थिरता यामध्ये सातत्याने बदल होत आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून राज्यात विविध माध्यमातून वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी वनविभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ग्रामीण भागात स्वत:ची जमीन असणाºया शेतकºयांना कन्या वन समृद्धी ही योजना लाभकारक ठरणार आहे. ज्या कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामुल्य देऊन प्रोत्साहित करण्यासाठी २७ जून २०१८ रोजी महसूल व वन विभागाने कन्या वन समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभाकरीता शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींकडे अर्ज करणे आवश्यक आहे. त्या शेतकरी दाम्पत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणाºया पहिल्या पावसाळ्यात १ ते ७ जुलै या कालावधीत १० झाडे लावण्याची संमती आहे. त्यानुसार जिल्ह्यातून वर्षभरात १ हजार ५०२ अर्ज वनविभागाला  प्राप्त झाले आहेत. आलेल्या अर्जावरून या पावसाळ्यात लाभार्थी कुटुंबाना वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे.  या रोपांचा आहे समावेशपाच रोपे सागाची, दोन रोपे आंबा, एक फणस, एक जांभुळ आणि एक चिंच अशा भौगौलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश कन्या वन समृद्धी योजनेमध्ये आहे. आज पर्यावरण दिन५ जून रोजी पर्यावर दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘कन्या वन समृद्धी’ योजनेची माहिती घेतली असता जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद या योजनेला मिळत असल्याचे दिसून आले. पर्यावरण, वृक्ष लागवड, संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादीबाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड व रूची निर्माण करणे, अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देण्याचा या योजेनचा मूळ उद्देश आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentवातावरणforestजंगल