शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

ग्रामसेवकांचा असहकार' कायम;  संघटनेचे जि. प. समोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:27 IST

आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे देत निदर्शने करण्यात आली.

 बुलडाणा : प्रलंबित समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने क्रांतिदिनापासून सुरु केलेला असहकार कायम आहे. दरम्यान आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे देत निदर्शने करण्यात आली. राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. मागण्या सोडविण्यासाठी संघटनेच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र प्रश्न निकाली काढण्यात आला नसल्यामुळे ९ आॅगस्ट क्रांतिदिनापासून असहकार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. केवळ प्रशासकीय कामकाजात सहभाग न घेण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. ग्रामस्तरावर सर्वसामान्य नागरिकांची कामे सुरु असल्याचे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. दरम्यान १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करुन पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजुर करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल करुन पदवीधर ग्रामसेवक नेमणूका कराव्या, सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढ करणे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांच्या वेतनत्रुटी दूर कराव्या, २००५ नंतर रुजू झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करावी, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करावी आदी प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. क्रांतिदिन ९ आॅगस्टपासून सुरु केलेले असहकार आंदोलन २२ आॅगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान प्रशासकिय कामकाजात असहकार राहणार आहे. गाव पातळीवर ग्रामसेवक जनतेची दैनंदिन कामे पार पाडतील. पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर विभागीय यंत्रणांना कोणताही अहवाल सादर करणार नाही. जि. प., पं. स. अथवा इतर अधिकारी, पदाधिकाºयांच्या बैठकांना बसणार नाहीत. तर २२ आॅगस्टपासून सर्व कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. धरणे आंदोलनात राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, बुलडाणा तालुकाध्यक्ष प्रमोद कोल्हे, सचिव रवींद्र बोबडे, कार्याध्यक्ष विलास मानवतकर, गणेश पायघन, देवेंद्र बरडे, अरविंद टेकाळे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामसेवक सहभागी झाले

प्रशासकिय कामकाज ठप्प

ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनामुळे दैनंदिन प्रशासकिय कामकाज ठप्प पडले आहे. पंचायत समिती स्तरावरुन शासनाला पाठविण्यात येणारे दैनंदिन अहवाल थांबले आहेत. कामांचा प्रगती अहवाल, योजनांचा आढावा शासनापर्यंत पोहचलेला नाही. आंदोलन असेच चालू राहिल्यास प्रशासकिय कामकाजावर चांगलाच परिणाम होणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत असहकार आंदोलन सुरु ठेवण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. .

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषदagitationआंदोलन