शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

जिल्ह्यात ८ मार्च ते १६ मार्च दरम्यान रात्रीची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:32 AM

जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित केला असून सर्व ठिकाणचे बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे ...

जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित केला असून सर्व ठिकाणचे बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे ८ मार्च ते १६ मार्चपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने सुरू राहतील. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळणे त्यांना बंधनकारक राहणार आहे. त्याचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. हॉटेल्स, खाद्यगृहे ही सकाळी ९ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत त्यांना केवळ पार्सल देण्याची मुभा राहील. या व्यतिरिक्त या कालावधीत सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री ९:३० पर्यंत मुभा राहील. या कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा या वेळापत्रकानुसार होणार असून परीक्षेच्या कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र संबंधितांनी सोबत ठेवणे अनिवार्य राहील.

--लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना मुभा--

या कालावधीत लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी घेणे अनिवार्य राहील. तसेच लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बॅँड पथकातील सदस्यांचाही समावेश राहील, असे ६ मार्च रोजीच्या आदेशात स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली, आंदोलने यावर बंदी घालण्यात आली आहे; मात्र केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन शासकीय विभागास निवेदन देता येईल, असेही आदेशात नमूद केेले आहे.

--बाजार समितीनेही गर्दीवर नियंत्रण ठेवावे--

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनावर राहील. तसेच शारीरिक अंतराचे पालन, मास्कचा वापर होतो की नाही, तथा हात धुण्याची व्यवस्था बाजार समिती सचिवांनीच करणे गरजेचे आहे. यासोबतच जिल्हा उपनिबंधकांनी सर्व संबंधित बाजार समित्यांमध्ये जाऊन नियमांचे पालन होते की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.