शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

नांदुरा पंचायत समिती सभापतीसह सदस्यांनी ‘हाता’त घेतले ‘कमळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 6:09 PM

नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी मुंबईत मुख़्यमंत्र्यांची भेट घेवून हातात कमळ घेतले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्क खामगाव :पक्षांतर्गत वाद शिगेला गेल्याचा फटका मलकापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाला बसत असल्याचे दिसून येते. दोन दिवसापूर्वीच नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी मुंबईत मुख़्यमंत्र्यांची भेट घेवून हातात कमळ घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीपूर्वीच काँग्रेससमोर आव्हान उभे राहीले आहे. लोकसभा निवडणूकीची त्सुनामी येण्यापूर्वीच नांदुरा तालुक्यातील राजकारण ‘बदला’ने ढवळून निघत असल्याचे दिसते. मलकापूर मतदार संघात नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक गावांचा समावेश होतो. भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत स्वत:च्या विजयश्री खेचून आणण्यासोबतच लोकसभा निवडणूकीत युतीच्या उमेदवाराला विजयश्री मिळवून देण्यासाठी त्यांनी दंड थोपाटल्याचे दिसून येते. मतदारसंघातील इतर पक्षाच्या नाराजांशी संपर्क साधून मतदारसंघ आणखी बळकट करण्यावर त्यांचे प्रयत्न असल्याचे दिसून येते. मलकापूर मतदारसंघात काँग्रेस, भाजप सोबत नांदुरा शहरात नगर विकास आघाडीचे प्राबल्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेतील राजकारणामध्ये भाजपचा वरचष्मा ठेवण्यासाठी स्थानिक नेतृत्व सातत्याने प्रयत्नशील राहते. काही महिन्यापूर्वीच नांदुरा नगर विकास आघाडी भगदाड पाडून संचेतींनी आपले राजकीय राजकीय प्राबल्य सिद्ध केले. नांदुरा नगराध्यक्ष रजनी अनिल जवरे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. नांदुरा शहरातील ही राजकीय घटना ताजी असतांनाच गेल्याच आठवड्यात त्यांनी नांदुरा पंचायत समितीच्या सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे पाटील यांनाा भाजपाच्या गळाला लावले आहे. इतकेच नव्हेतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभापती अर्चना पाटील व सदस्या योगिता गावंडे पाटील यांचा प्रवेश मुंबईत घडवून आणला. यामध्ये आमदार चैनसुख संचेती यांची राजकीय परिपक्वता दिसून येत असली तरी काँग्रेसमधील वाढता असंतोष हे या राजकीय घडामोडीमागील प्रमुख कारण असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान धांडे यांच्या आत्मकेंद्री राजकारणामुळे गेल्या काही महिन्यापासून काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे वास्तव आहे. गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमधील तणाव वाढीला लागला आहे. पंचायत समिती नांदुरा येथे वेगवान राजकीय घडामोडी घडल्याचे दिसून येते. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसच्या सभापतींसह सदस्यांनी धांडे गटाला चारीमुंड्या चित करण्यासाठी परस्पर विरोधी विचारधारेच्या राजकीय पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी हातमिळवणी करीत ‘बदला’साठी सज्ज झाल्याचे दिसून येते. भाजपप्रवेशाबाबत नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना पाटील व सदस्या योगिता गावंडे पाटील यांनी काँग्रेसमधील व्यक्तीकेंद्रीत राजकारणामुळे पक्ष त्याग केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व काही सदस्यांच्या पक्षाविरोधात हालचाली सुरु होत्या. त्याकडे आम्ही लक्ष ठेवून होतो. तशा तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यांना भिती होती की, पक्षातून एक दिवस आपल्याला काढल्या जाईल अशी भिती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून पक्ष सोडला आहे. - राहूल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, बुलडाणा

टॅग्स :PoliticsराजकारणMalkapurमलकापूरNanduraनांदूराBJPभाजपाcongressकाँग्रेस