शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नांदुरा पंचायत समिती सभापतीसह सदस्यांनी ‘हाता’त घेतले ‘कमळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:12 IST

नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी मुंबईत मुख़्यमंत्र्यांची भेट घेवून हातात कमळ घेतले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्क खामगाव :पक्षांतर्गत वाद शिगेला गेल्याचा फटका मलकापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाला बसत असल्याचे दिसून येते. दोन दिवसापूर्वीच नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी मुंबईत मुख़्यमंत्र्यांची भेट घेवून हातात कमळ घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीपूर्वीच काँग्रेससमोर आव्हान उभे राहीले आहे. लोकसभा निवडणूकीची त्सुनामी येण्यापूर्वीच नांदुरा तालुक्यातील राजकारण ‘बदला’ने ढवळून निघत असल्याचे दिसते. मलकापूर मतदार संघात नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक गावांचा समावेश होतो. भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत स्वत:च्या विजयश्री खेचून आणण्यासोबतच लोकसभा निवडणूकीत युतीच्या उमेदवाराला विजयश्री मिळवून देण्यासाठी त्यांनी दंड थोपाटल्याचे दिसून येते. मतदारसंघातील इतर पक्षाच्या नाराजांशी संपर्क साधून मतदारसंघ आणखी बळकट करण्यावर त्यांचे प्रयत्न असल्याचे दिसून येते. मलकापूर मतदारसंघात काँग्रेस, भाजप सोबत नांदुरा शहरात नगर विकास आघाडीचे प्राबल्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेतील राजकारणामध्ये भाजपचा वरचष्मा ठेवण्यासाठी स्थानिक नेतृत्व सातत्याने प्रयत्नशील राहते. काही महिन्यापूर्वीच नांदुरा नगर विकास आघाडी भगदाड पाडून संचेतींनी आपले राजकीय राजकीय प्राबल्य सिद्ध केले. नांदुरा नगराध्यक्ष रजनी अनिल जवरे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. नांदुरा शहरातील ही राजकीय घटना ताजी असतांनाच गेल्याच आठवड्यात त्यांनी नांदुरा पंचायत समितीच्या सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे पाटील यांनाा भाजपाच्या गळाला लावले आहे. इतकेच नव्हेतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभापती अर्चना पाटील व सदस्या योगिता गावंडे पाटील यांचा प्रवेश मुंबईत घडवून आणला. यामध्ये आमदार चैनसुख संचेती यांची राजकीय परिपक्वता दिसून येत असली तरी काँग्रेसमधील वाढता असंतोष हे या राजकीय घडामोडीमागील प्रमुख कारण असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान धांडे यांच्या आत्मकेंद्री राजकारणामुळे गेल्या काही महिन्यापासून काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे वास्तव आहे. गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमधील तणाव वाढीला लागला आहे. पंचायत समिती नांदुरा येथे वेगवान राजकीय घडामोडी घडल्याचे दिसून येते. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसच्या सभापतींसह सदस्यांनी धांडे गटाला चारीमुंड्या चित करण्यासाठी परस्पर विरोधी विचारधारेच्या राजकीय पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी हातमिळवणी करीत ‘बदला’साठी सज्ज झाल्याचे दिसून येते. भाजपप्रवेशाबाबत नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना पाटील व सदस्या योगिता गावंडे पाटील यांनी काँग्रेसमधील व्यक्तीकेंद्रीत राजकारणामुळे पक्ष त्याग केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व काही सदस्यांच्या पक्षाविरोधात हालचाली सुरु होत्या. त्याकडे आम्ही लक्ष ठेवून होतो. तशा तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यांना भिती होती की, पक्षातून एक दिवस आपल्याला काढल्या जाईल अशी भिती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून पक्ष सोडला आहे. - राहूल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, बुलडाणा

टॅग्स :PoliticsराजकारणMalkapurमलकापूरNanduraनांदूराBJPभाजपाcongressकाँग्रेस