शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मूल होत नाही म्हणून विवाहितेला जिवे मारले पाच जणांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 13:55 IST

मूल होत नाही म्हणून विवाहितेला जिवे मारल्याची घटना मालकापुरात घदली.

मलकापूर: मुलबाळ होत नाही म्हणून सासरच्या मंडळीनी विवाहितेला गळा आवळून जिवे मारल्याची घटना येथील मोहनपुरा भागात शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीर अहमद अ.बशीर यांच्या सायमा कौसर या मुलीचा विवाह मोहनपुऱ्यातील शे.मोहम्मद शे.यूसूफ याच्याशी झाला होता. सायमा कौसर हिला मूलबाळ होत नाही. या कारणामुळे तिचा बऱ्याच दिवसापासून शारिरिक व मानसिक छळ सुरु होता. यामुळे ती खुप त्रस्त होती. याबाबत तिने अनेकदा सांगितले सुद्धा होते. मात्र दिवस उलटले की सर्व काही ठिक होईल अशी आशा माहेरच्यांना होती. मात्र तिचा त्रास वाढतच गेला. अखेर २९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सासरच्या मंडळीने सायमा कौसर हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार जमीर अहमद शेख बशीर.यांनी शहर पोलीसात दिली.

पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून मृतक सायरा कौसर चे पती शे.मोहम्मद शे.यूसूफ, सासू जुलेखाबी शे.युसुफ, दिर शे.अमीन शे.युसुफ, दिराणी जमिलाबी शे.अमीन,मामसासरे शे.हमीद शे.अहमद अशा पाच जणांविरुद्ध शुक्रवारी कलम ३०२,४९८ अ,३२३,३४ अन्वये भा.द.वी.चा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी उशिरा रात्री  विवाहीतेचा पती, सासू, दीर, दिराणी अशा चार जणांना अटक करून गजाआड केले आहे. तर पाचवा आरोपी मामसासरा शे.हमीद शे.अहमद हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे यांनी दिली आहे. या घटनेमुळे  मोहनपुऱ्यात एकच खळबळ उडाली असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी