उघड्यावर शौचास जाणा-या १७० जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:11 IST2017-07-30T00:08:52+5:302017-07-30T00:11:15+5:30

उघड्यावर शौचास जाणा-या १७० जणांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: शासनाने स्वच्छ भारत मिशन युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना केल्याने मेहकर नगरपालिकेचे गुडमॉर्निंग पथक शहरात सक्रिय झाले असून, मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसणाºया जवळपास १७० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उघड्यावर शौचास बसणाºयांना न.प.च्या भरारी पथकाचा चाप बसत आहे.
आपले घर, परिसर व शहर स्वच्छ राहून नागरिकांचे आरोग्यसुद्धा निरोगी व सुदृढ राहावे, यासाठी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर करावा, तसेच उघड्यावर कोणीही शौचास बसू नये, अशा शासनाच्या सक्त सूचना आहेत. तर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून वेळप्रसंगी गुन्हासुद्धा दाखल करण्यात येत आहे. मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन नियोजनबद्ध पद्धतीने व युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. यासाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीसुद्धा करण्यात आली. तर आता गुडमार्निंग पथकाचे ४ भरारी पथक नेमून अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली रतन शिरपूरकर, संतोष राणे, सुधीर सारोळकर, पवन भादुपोता, पाठक प्रमुख आदींच्या समावेश आहे.
हे भरारी पथक सकाळी ५ वाजतापासून दिवसभर व रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या परिसरात फिरून उघड्यावर शौचास बसणाºया व नियमांचे उल्लंघन करून अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाइ करीत आहे.
आतापर्यंत १७० जणांवर कारवाई करण्यात आली असून, स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहकार्य करून आपलाच परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी अशोक सातपुते यांनी यावेळी केले.
उघड्यावर शौचास बसणा-याला गुलाबपुष्प
मेहकर पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी आर.पी. पवार, अशोक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात गुडमार्निंग पथक राबवून उघड्यावर शौचास बसणाºयावर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी बरटाळा, चिंचोली बोरे, दादुलगव्हाण या गावांना भेटी देऊन उघड्यावर शौचास बसणाºयाला गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने त्यांचे स्वागत करून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी स्वच्छता अभियानामध्ये दत्तात्रय मगर, ग्रामसेवक भगवान काळे, कैलास वानखेडे, एम.आर. पाटील, सरंपच अरुण दळवी, गजानन सावंत, सुमंता बोरे आदी सहभागी झाले आहेत.