शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

मजीप्रा उठली खामगाव पालिकेच्या मुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:18 IST

खामगाव: शहरातील पाणी पुरवठय़ाची घडी बसवताना महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणकडून वारंवार पालिकेला कोंडीत पकडण्यात येत आहे. परिणामी,  शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे.

ठळक मुद्देमजीप्राचे आडमुठे धोरण पालिकेला दीड कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: शहरातील पाणी पुरवठय़ाची घडी बसवताना महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणकडून वारंवार पालिकेला कोंडीत पकडण्यात येत आहे. परिणामी,  शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे.  २0१३ पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेचा ताबा सोडत  नसल्याने, पालिकेला प्रति महिना दीड कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे.एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला पालिका पाणीपुरवठा करते.  त्यासाठी शहरापासून सुमारे २२ किलोमीटरपर्यंत  पाइपलाइन आहे. यामध्ये गेरू  माटरगाव ते जळका भंडग येथील जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत  पाणी  पोहोचविण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असून, शुद्धीकरण  झालेले पाणी दोन टाक्यांमध्ये आणून वितरणाची जबाबदारी पालिकेची आहे. यात  मात्र उभय संस्थांमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. त्यामुळे येथील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. शहराच्या पाणीपुरवठय़ाची  जबाबदारी पालिकेकडे देण्यासाठी मजीप्राकडे वारंवार पत्रव्यवहार झाला; पण  मजीप्राकडून थकीत रकमेसाठी पालिकेला वेठीस धरल्या जात असून, योजनेचा  ताबा देण्यासही नकार दिल्याची धक्कादायक माहिती आहे. देखभाल दुरुस्तीचा  खर्च पालिकेलाच करावा लागतो.

असा आहे खर्च!मजीप्रा, वीज वितरण, पाटबंधारे विभाग, दूरसंचार आणि पालिका यांच्यावर  पुरवठय़ाची दामोदार आहे. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला धरणापासून  जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरवठय़ासाठी सुमारे २ कोटी रुपये, वीज वितरण  कंपनीला वीज बिलापोटी ५0 लाख रुपये, टेलिफोन बिल, पाटबंधारे विभागाचा  खर्च आणि वितरणाचा खर्च मिळून पालिकेला सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च येतो.

२६ कोटींची कोंडीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पालिकेकडे २६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.  यामध्ये १२ कोटी रुपयांच्या मूळ रकमेचा समावेश असून, १४ कोटी रुपयांच्या  व्याजाचा समावेश आहे. थकीत रक्कमेचा आधी भरणा करा, नंतरच योजनेचा  ताबा घ्या, अशी भूमिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतल्या जात आहे.  त्यामुळे पालिका प्रशासनावरील आर्थिक बोजा वाढत असल्याचे दिसून येते.

सततचा तोटा ठरणार घातक!महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पाणी विकत घेतल्यानंतर पुरवठय़ावरही खर्च  करावा लागत असल्याने योजनेवर दुपटीने खर्च करावा लागतो. त्यामुळे खामगाव  नगर पालिका प्रशासन पाणीपुरवठय़ाबाबत तोट्यात असल्याचे दिसून येते. सततच्या  तोट्यामुळे पाणी पुरवठा योजना आवाक्याबाहेर जाण्याची भीतीही तज्ज्ञांकडून  व्यक्त केली जात आहे.

खासगीकरणातून पालिकेची होणार बचत!पाणी पुरवठय़ाची घडी बसविण्यासाठी तसेच रकमेच्या बचतीसाठी पाणी पुरवठा  योजनेचे खासगीकरण करण प्रस्तावित आहे. यामध्ये धरणापासून ते शहरात वि तरणापर्यंतच्या पाणीपुरवठय़ाची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहणार  आहे; मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून योजनेचा ताबा दिल्या जात नसल्याने  पालिकेचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. दरम्यान, या योजनेचे  खासगीकरण केल्यानंतर कंत्राटदाराचे बिल थकल्यास पाणी पुरवठा योजना ठप्प  होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेचे सवरेतोपरी प्रयत्न केले जात  आहेत. सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यासाठी पालिका प्रयत्नरत आहे.- सतीशआप्पा दुडे, पाणी पुरवठा सभापती, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :water transportजलवाहतूक