शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

स्वातंत्र्य प्राप्तीपासून मढी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित!

By admin | Updated: May 7, 2017 02:17 IST

आमदारांसह सर्व अधिकार्‍यांनी केली पाहणी

किशोर मापारी लोणार : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वैज्ञानिक प्रगती करत देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना गेल्या ७0 वर्षांंपासून तालुक्यातील आदिवासीबहुल मढी गाव विकासापासून वंचित आहे. मढी गावात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. चारही बाजूनी जंगल असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी दीड वर्षापूर्वी मढी गावाला भेट देऊन संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना विकासकामे त्वरित सुरू करण्यासाठी सांगितले होते. परंतु, अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे गेल्या दीड वर्षात रस्ते व पाणी प्रश्न कायम असल्यामुळे मढी ग्रामस्थ किती हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यालयप्रमुखांना घेऊन आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी ५ मे रोजी मढी गावाला अधिकार्‍यांची वारी करून आणली.तालुक्यातील मराठवाड्याच्या टोकावर असलेले मढी घनदाट जंगलाच्या आणि डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आहे. जेमतेम ३00 लोकसंख्या असल्यामुळे मढी आणि सावरगाव मुंढे ही दोन गावे मिळून एक गटग्रामपंचायत आहे. गेल्या ७0 वषार्ंपासून आदिवासीबहुल मढी गावाला कोणताही पक्का किंवा कच्चा रस्ता नसल्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही. रस्त्याअभावी वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी पोहचू न शकल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गावात पाणी आणि वीज नसल्यामुळे ग्रामस्थ नरकयातना भोगत जीवन जगत आहेत. याची जाणीव झाल्याने आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी दीड वर्षांंपूर्वी मढी गावाला भेट देऊन पाहणी करत समस्या जाणून घेतल्या होत्या. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजा प्रथम पूर्ण करण्यात याव्यात, याबाबत त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचनादेखील केल्या होत्या. परंतु वर्षभराचे बिल एकदमच आल्याने ग्रामस्थ वीज बिल भरू शकले नाहीत. यामुळे पुन्हा त्यांना उन्हाळ्यात दिवसा उकाड्यात आणि रात्री अंधारात राहावे लागत आहे. अधिकार्‍यांच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे ग्रामस्थ अजूनही नरकयातना भोगत जीवन जगत असल्याची माहिती मिळताच आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी तालुक्यातील सर्वच प्रशासकीय कार्यालयप्रमुखांना सोबत घेऊन गावाची वारी घडवून आणली. गावात फिरून तेथील हलाखीची परिस्थिती दाखवून दिली. त्यामुळे आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी निर्णय घेत १३ मे रोजी रस्ता आणि विहिरीचे भूमिपूजन करण्यात येईल, तसेच आमदार निधीतून सभामंडप करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.