शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

स्वातंत्र्य प्राप्तीपासून मढी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित!

By admin | Updated: May 7, 2017 02:17 IST

आमदारांसह सर्व अधिकार्‍यांनी केली पाहणी

किशोर मापारी लोणार : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वैज्ञानिक प्रगती करत देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना गेल्या ७0 वर्षांंपासून तालुक्यातील आदिवासीबहुल मढी गाव विकासापासून वंचित आहे. मढी गावात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. चारही बाजूनी जंगल असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी दीड वर्षापूर्वी मढी गावाला भेट देऊन संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना विकासकामे त्वरित सुरू करण्यासाठी सांगितले होते. परंतु, अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे गेल्या दीड वर्षात रस्ते व पाणी प्रश्न कायम असल्यामुळे मढी ग्रामस्थ किती हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यालयप्रमुखांना घेऊन आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी ५ मे रोजी मढी गावाला अधिकार्‍यांची वारी करून आणली.तालुक्यातील मराठवाड्याच्या टोकावर असलेले मढी घनदाट जंगलाच्या आणि डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आहे. जेमतेम ३00 लोकसंख्या असल्यामुळे मढी आणि सावरगाव मुंढे ही दोन गावे मिळून एक गटग्रामपंचायत आहे. गेल्या ७0 वषार्ंपासून आदिवासीबहुल मढी गावाला कोणताही पक्का किंवा कच्चा रस्ता नसल्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही. रस्त्याअभावी वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी पोहचू न शकल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गावात पाणी आणि वीज नसल्यामुळे ग्रामस्थ नरकयातना भोगत जीवन जगत आहेत. याची जाणीव झाल्याने आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी दीड वर्षांंपूर्वी मढी गावाला भेट देऊन पाहणी करत समस्या जाणून घेतल्या होत्या. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजा प्रथम पूर्ण करण्यात याव्यात, याबाबत त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचनादेखील केल्या होत्या. परंतु वर्षभराचे बिल एकदमच आल्याने ग्रामस्थ वीज बिल भरू शकले नाहीत. यामुळे पुन्हा त्यांना उन्हाळ्यात दिवसा उकाड्यात आणि रात्री अंधारात राहावे लागत आहे. अधिकार्‍यांच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे ग्रामस्थ अजूनही नरकयातना भोगत जीवन जगत असल्याची माहिती मिळताच आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी तालुक्यातील सर्वच प्रशासकीय कार्यालयप्रमुखांना सोबत घेऊन गावाची वारी घडवून आणली. गावात फिरून तेथील हलाखीची परिस्थिती दाखवून दिली. त्यामुळे आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी निर्णय घेत १३ मे रोजी रस्ता आणि विहिरीचे भूमिपूजन करण्यात येईल, तसेच आमदार निधीतून सभामंडप करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.