शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रस्ते विकासासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 6:01 PM

अकोला : राज्यातील १५०० किमि रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी शासनाने आशियाई विकास बँकेकडून ३५०० कोटी रुपये कर्ज घेण्याला मंजूरी दिली आहे.

अकोला : राज्यातील १५०० किमि रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी शासनाने आशियाई विकास बँकेकडून ३५०० कोटी रुपये कर्ज घेण्याला मंजूरी दिली आहे. या कर्जाची परतफेड २०४५-४६ पर्यंत दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यासोबतच रस्त्यांचा वापर करणाऱ्यांकडून पथकर वसुलीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात रस्त्यांचा वापर करणाऱ्या जनतेच्या खिशावर टोलवसुलीचाही भार पडणार आहे.रस्ते सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार येत्या तीन वर्षात १५०० किमिच्या रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील या कामांची एकुण किंमत ५००५ कोटी रुपये आहे. त्यापैकी ७० टक्के रक्कम आशियाई विकास बँकेच्या कर्जातून उपलब्ध केली जाणार आहे. तर ३० टक्के रक्कम म्हणजे, १५०५ कोटी रुपये शासनाचा सहभाग म्हणून दिली जाणार आहे. ही तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध होणाºया निधीतून करावी लागणार आहे. आशियाई विकास बँकेतून घेतलेल्या कर्जाची रक्कम २०१९-२० पासून ते २०४५-४६ या आर्थिक वर्षापर्यंत परतफेड करण्याचेही ठरवण्यात आले आहे. त्यासाठी राज्याच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पात किमान २१८ कोटी ते १९१४ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. या रकमेसोबतच सुधारणा झालेल्या रस्त्यांवर वाहनधारकांकडून पथकर वसुली केली जाणार आहे. त्यातून प्राप्त होणारी रक्कमही बँकेच्या कर्जापोटी भरली जाईल. 

या मार्गांची होणार सुधारणाकर्ज घेऊन सुधारणेसाठी निवड केलेल्या रस्त्यांमध्ये प्रमुख राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या ९० हजार किमि रस्त्यांपैकी १८१८९ किमि रस्त्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी १५०० किमिचे रस्ते कर्जातून होणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्गbankबँक