गेल्यावर्षीचे पीक कर्जदार पुनर्गठनास पात्र!

By Admin | Updated: June 8, 2016 02:18 IST2016-06-08T02:18:50+5:302016-06-08T02:18:50+5:30

बॅकांनी माहिती फलकावर कागदपत्रांचा तपशील देण्याचे जिल्हाधिका-यांनी दिले आदेश.

Last year's peak debtor deserves reorganization! | गेल्यावर्षीचे पीक कर्जदार पुनर्गठनास पात्र!

गेल्यावर्षीचे पीक कर्जदार पुनर्गठनास पात्र!

बुलडाणा : गतवर्षी खरीप हंगामामध्ये पीक कर्ज घेतलेले शेतकरी या हंगामासाठी कर्जाचे पुनर्गठन करण्यास पात्र आहेत. अशा शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे त्वरित पुनर्गठन बँकांनी पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी दिले आहेत.
या वर्षाचा खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकरी खरिपातील पेरणीच्या तयारीला लागला आहे. शेतकरी खते, बियाणे खरेदी करीत आहेत. त्यामुळे पीक कर्जाचा प्रश्न रेंगाळत राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्देश दिले आहेत.
खरीप हंगाम-२0१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या ज्या शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन २0१५ मध्ये झाले नाही, तसेच पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी पुनर्गठनास अपात्र आहेत; मात्र २0१५ मध्ये पीक कर्ज घेतलेले सर्व शेतकरी पुनर्गठनास पात्र आहेत. ज्या शेतकर्‍यांनी कोणत्याही बँकेकडून पीक कर्ज घेतलेले नाही, ते नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र आहेत. पात्र शेतकर्‍यांचे बँकांनी त्वरित पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज द्यावे. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेनेही पीक कर्ज वाटपास सुरुवात केली असून, ज्या ग्रामसेवा सहकारी संस्थांचे थकीत पीक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना अजिसपूर येथील ग्रामसेवा संस्थेने मंगळवारपर्यंंत ४ लाख ८0 हजारांचे तर बुलडाणा ग्रामसेवा संस्थेने १ लाख ९७ हजाराचे पीक कर्ज वाटप केले आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Last year's peak debtor deserves reorganization!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.