शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

पाण्याच्या दीर्घकालीन नियोजनाचा अभाव;  खडकपूर्णा संघर्ष केवळ झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 14:38 IST

खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक आणि स्थानिक राजकारण तापल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुमारे १२ टीएमसी पाण्याच्या परिणामकारक वापरावर भर देण्याची गरज आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : बदलते पर्जन्यमान, तापी आणि गोदावरी जलआराखड्याचा अनुषंगाने पाण्याची उपलब्धता तथा खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक आणि स्थानिक राजकारण तापल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुमारे १२ टीएमसी पाण्याच्या परिणामकारक वापरावर भर देण्याची गरज आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास जिल्ह्याची महत्तम पाणीसाठवण क्षमता ही ३८ टीएमसीच्या आसपास जाईल. मात्र येत्या २० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता पाहता पाण्याचे पैशाच्या वापराप्रमाणेच जिल्ह्यात नियोजन अनिवार्य झाले आहे. अन्यथा प्रादेशिक तथा मतदार संघापुरता मर्यादीत असलेला आजच्या पाण्याचा संघर्ष हा अगदी गावपातळीपर्यंत पोहचण्याची साधार भीती आहे. त्यामुळे येत्या लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीत पाणी उपलब्धता हा एक कळीचा मुद्दा म्हणून उभा ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. खडकपूर्णाच्या पाण्यावरून निर्माण होऊ पाहणारा प्रादेशिक वाद तथा सिंदखेड राजा मतदार संघातील स्थानिक राजकारण्यांमधील संघर्ष ही भविष्यातील एक छोटी झलक आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. दोन लाख २३ हजार ४४ हेक्टर (३१) महत्तम सिंचन क्षमता असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्षात आठ टक्क्यांच्या आसपास सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. त्याचा वापर किती होतो हे न बोललेले बरे. जिगावमुळे जिल्ह्याच्या पाणीसाठवण क्षमतेमध्ये २६ टीएमसीची भर पडले. मात्र या पाण्याची उपयुक्तता ही प्रामुख्याने घाटाखालील तालुक्यातच अधिक असले. त्यावेळचे चित्रही वेगळे असले. घाटावरील बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा तालुक्यांचा विचार करता या भागात उपलब्ध पाण्याचेच सुयोग्य नियोजन भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. खडकपूर्णा सहा टिएमसी, पेनटाकळी चार टिएमसी, कोराडी व अन्य लघू प्रकल्प मिळून जवळपास दोन टिएमसी असे पाणी उपलब्ध आहे. मात्र प्रकल्पही महत्तम क्षमतेने भरले जात नाही. त्यामुळे प्रचलीत पाणीवापराला बगल देऊन ठिबक सिंचलनाला प्राधान्य देण्याचा प्रभावी प्रयत्न या संघर्षाच्या पृष्ठभूमीवर आवश्यक झाला आहे. तशी जलजागृतीही काळाची गरज बनली असताना पीके घेण्याच्या पॅटर्नमध्ये बदलाला वाव दिल्यावा लागेल. गोदावरी जलआराखडा पूर्णत्वास गेला आहे. त्यातील पूर्णा (खडकपूर्णा) हे उपखोरे आहे. गेल्या २५ वर्षातील पावसाचे प्रमाण, वाहून जाणारे पाणी आणि पर्यावरणीय समतोल राखत प्रकल्पाखालील भागात किती पाणी गेले पाहिजे याचा अभ्यास करूनच हा आराखडा पूर्णत्वास गेला आहे. त्यातच जलयुक्त शिवारच्या कामामुळे ग्रामपातळीवरही जलसाठे निर्माण झाले आहेत. त्याचा प्रकल्पातील पाण्याच्या आवकेवरही काही प्रमाणात का होईना परिणाम झाला आहे. परिणाम स्वरुप संघर्षापेक्षा पाणीवापर नियोजनाला प्राधान्य आवश्यक झाले आहे. जलसंपदेचा प्रभावी वापर आवश्यक पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता अधिक असतानाही तेथे ठिबकच्या वापराला प्राधान्य दिल्या गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याच्या वापरालाही त्याची जोड दिल्यास शेती सिंचनासोबतच भविष्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल. आज शहरी भागात सुमारे सहा लाख तर ग्रामीण भागात १८ लाख लोकसंख्या आहे. दर तिसर्या वर्षी अवर्षण प्रवण स्थिती जिल्ह्यात निर्माण होते. पाऊसही अपघाव पद्धतीने पडत असल्याने तोही मोठे नुकसान करत आहे. या सर्व बाबींचा मेळ घालून उपलब्ध जलसंपदेचा प्रभावी व काटकसरीने वापर आवश्यक आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर