शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप धोक्यात; दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

सुरुवातीला तालुक्याच्या पूर्वेकडील भागात अतिवृष्टीने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या; काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडली. यातूनही काही प्रमाणात पिके ...

सुरुवातीला तालुक्याच्या पूर्वेकडील भागात अतिवृष्टीने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या; काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडली. यातूनही काही प्रमाणात पिके वाचली आहेत. त्या पिकांसह पावसाचा अभाव असलेल्या उर्वरित भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेकडो हेक्टरवरील पिके करपून जात आहेत.

तालुक्यात २८ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. परिणामी तालुक्यातील ५८ टक्के हेक्टरवरील पेरण्या रखडल्या होत्या. त्यापश्चात २९ जूनला दमदार पाऊस बरसला. मात्र, तालुक्यातील पूर्वेकडील भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने या भागातील शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित झाली. शेतजमिनी वाहून गेल्याने शेती निरूपयोगी ठरली. अनेक शेतात पाणी शिरल्यानेही मोठे नुकसान झाले. २९ जूनच्या पावसाने उर्वरित तालुक्याला मात्र दिलासा मिळाला. त्या पावसाने जमिनीत झालेल्या ओलीच्या भरवशावर बळीराजाने शिवारात चाड्यावर मूठ ठेवली; त्यामुळे सर्वत्र पेरणीचा बार उडविण्यात आला. त्या पश्चात आठ दिवस उलटत असतानाही पावसाचा एक टिपूस पडला नसल्याने जमिनीतील ओलाव्यामुळे अंकुरलेले पीक आता करपून जात आहे. यामध्ये सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार संचाव्दारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे. मात्र, कोरडवाहू क्षेत्र उद्ध्वस्तीच्या मार्गावर आहे. पावसाअभावी नुकतेच अंकुरलेला कोवळा खरीप उन्हाच्या तडाख्याने होरपळू लागला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पावसाची हीच स्थिती राहिल्यास दुबार पेरणी करावी तरी कशी, या विवंचनेत शेतकरी असून, या दोन-तीन दिवसात पावसाने कृपा केली तर ठीक, नसता संपूर्ण खरीप हातातून जाण्याची भीती आहे.

बळीराजा चिंताग्रस्त

तालुक्यात काही भागात खरिपातील पिकांची चांगली उगवण झाली आहे. त्यामुळे शेतशिवारात डवरणी, निंदणीची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, पावसाने सलग आठ दिवस दडी मारल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. अनेक शेतातील पिके पिवळी पडली आहेत. खरिपावर ओढवलेल्या या संकटात केवळ पाऊसच तारणहार ठरणार आहे. मात्र, पावसाकडून तसे संकेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दुबार पेरणीसाठी बियाणांची तजवीज करावी तरी कशी?

चिखली : तालुक्यात एकूण लागवडीचे क्षेत्र ८८ हजार ४२३ हेक्टर आहे. यापैकी खरिपातील प्रमुख पीक सोयाबीनचे क्षेत्र तब्बल ६८ हजार ३८० हेक्टर एवढे आहे. यासाठी लागणारे ६८ हजार ३५६ क्विंटल सोयाबीन बियाणे सुरुवातीला उपलब्ध होते. मात्र, आता जर पेरण्या उलटल्या तर ऐनवेळी बियाणांचीही चणचण भासणार आहे. त्यातच सध्या सोयाबीनचे भाव तेजीत आहेत. यामध्ये बियाणे १२ रुपये किलोपर्यंत आहेत. बियाणांचे हे भाव शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने शेतकरीवर्गात अस्वस्थता आहे.