खामगाव कृऊबास पाडली बंद
By Admin | Updated: May 28, 2014 00:37 IST2014-05-27T23:46:03+5:302014-05-28T00:37:46+5:30
भुईमूगाचे भाव पाडल्याने शेतकर्यांमध्ये रोष.

खामगाव कृऊबास पाडली बंद
खामगाव : भुईमुंगाचे भाव पाडल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकर्यांनी आज मंगळवार २७ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पाडली. आक्रमक होवून शेतकर्यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप ठोकले. यामुळे जवळपास ३ तास येणारी-जाणारी मालवाहतूक बंद होती. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुंगाची आवक मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. गेल्या दोन दिवसात भुईमुंगाला २९00-३६२0 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर आज मंगळवारी ही मोठय़ा प्रमाणात भुईमुंगाची आवक वाढली होती. मात्र दुपारपर्यंत भुईमुंगांसाठी हर्रासीची बोली बोलल्याच गेली नाही. तर काही व्यापार्यांनी खाली घसरुन एकदमच १८00 ते २२00 रुपये प्रतिक्विंटल भाव सांगितले. यामुळे शेतकर्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होवून भुईमुंगाचे भाव अध्र्यावरच आल्याने शेतकरी संतप्त झाले. कमी भाव मिळत असल्याने अन्याय होत असल्याची भावना शेतकर्यांमध्ये आल्यानंतर जागृत होवून सर्व शेतकरी एकत्रित आले व शेतकर्यांनी बाजार समितीचे मुख्य प्रवेशव्दार बंद केले. शेतकर्यांनी भाव कमी मिळत असल्याची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख यांच्याकडे केली.