शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

धामणगाव परिसरात करवंद बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:34 IST

चैत्र महिन्यापासून या आंबटगोड काटेरी करवंदांच्या जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंदे लागतात. सध्या कडक ...

चैत्र महिन्यापासून या आंबटगोड काटेरी करवंदांच्या जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंदे लागतात. सध्या कडक निर्बंध असल्याने शेतकरी ते घेऊन शहरासह ग्रामीण भागात येऊ शकत नाहीत.

पिकल्यावर त्याचा रंग काळा होतो.परिसरातील लोक रखरखत्या उन्हाची पर्वा न करता हा रानमेवा जमा करतात. काही काळापूर्वी ही करवंदे पाच रुपयांना छोटे माप व दहा रुपयाला मोठे माप विकले जात होते. यातून काही लोकांना रोजगार मिळत असे. प्रचंड जंगलतोड व वणव्यामुळे करवंदाची झाडे दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. मात्र, यावर्षी कोरोनासारखे संकट आल्यामुळे आणि त्यातच संचारबंदी व ताळेबंदी यामुळे करवंदे व रानमेव्याची चव दुर्मीळ झाली आहे.

उन्हाळ्याचे आगमन होताच करवंदे व इतर रानमेवा बाजारात येतो. यामध्ये कैरी, चिंच, जांभळे आदी डोंगरदऱ्यामध्ये तयार झालेला रानमेवा बाजारात दाखल होत असे. या करवंदे व रानमेवा यामुळे लोकांना रोजगार मिळत असतो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे करवंदे व रानमेवा दुर्मीळ झाल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. रुचकर, चविष्ट, स्वस्त व औषधी असलेल्या या करवंदे व रानमेव्याची अनेकांना भुरळ पडत असते.

अनेकांचा राेजगार बुडाला

डोंगरातील रानमेवा हे लोकांचे या उन्हाळ्याच्या दिवसांत उत्पन्नाचे साधन असते. डोंगरदऱ्यातील करवंदे व रानमेवा तयार झाला असून त्याची ताळेबंदीमुळे विक्री होत नाही. त्यामुळे या फळांची चव सध्या दुर्मीळ झाली आहे. या रानमेव्याची लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची मागणी असते. औषधी गुणधर्म असणारी करवंदे यंदा कडक निर्बंधामुळे शहरातील नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे़