शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

...म्हणून भाजपाशी जुळवूण घेणे अवघड झाले होते, आनंदराव अडसुळांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 19:06 IST

सत्तेत सोबत असतानाही भाजपची स्वार्थी वृत्ती दिसून आली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपपासून दूर गेल्याचे ते म्हणाले.

बुलडाणा: अलिकडील काळात राजकारणाची व्याख्या बदलत असून तत्व पाळल्या जात नसल्याची खंत शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी बुलडाणा येथे व्यक्त केली. बुलडाणा येथे औपचारिक भेटीवर ते आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब अधोरेखीत केली. दरम्यान, भाजपशी  त्यावेळी जुळवून घेणे अत्यंत अवघड झाले होते. सत्तेत सोबत असतानाही भाजपी स्वार्थी वृत्ती दिसून आली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपपासून दूर गेल्याचे ते म्हणाले.सातत्याने भाजपकडून दिला जाणारा दुजाभाव पाहता अखरे शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यावी लागली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीएएला शिवसेनेचा विरोध नाही पण एनआरसीमध्ये नंतर टाकण्यात आलेल्या काही अटी अडचणीच्या आहेत. त्याबाबात भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे ते म्हणाले.अमरावतीच्या राजकारणात सक्रीयच असून तेथे आपला फोकस कायम आहे. निश्चलीकरणामुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या. सामान्य माणसापासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच अडचणी आल्या व अर्थचक्राला फटका बसला, अद्याप त्यातून आपण वर आलो नाही, असे सांगत बेरोजगारी वाढली आहे. उद्योग बंद पडले आहेत. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात असले तरी जिडीपी साडेचार ते पाच टक्क्यावर जात नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेते सर्व आलबेलबुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद असल्याबाबत त्यांना छेडले असता प्रथमत: या मुद्द्यावर बोलण्याचे त्यांनी टाळले. मात्र जिल्ह्यात शिवसेनेची पूर्वीचीच ताकद कायम आहे. दोन आमदार, एक खासदार येथे आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत असे वाद नाही, असेच त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे बुलडाण्यात आपण प्रदीर्घ काळ खासदार होता. बुलडाण्यात मिळालेले प्रेम आणि येथील सांस्कृतिक वारसा हा माणुसकीचा आहे. आज अन्यत्र परिवर्तन होत असले तरी बुलडाणेकरांनी आपल्यातील माणुसकी टिकवून ठेवली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळBJPभाजपाShiv Senaशिवसेना