शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यांच्यावर वाढवा- प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 10:55 IST

Prataprao Jadhav on Reservation : ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी अथवा या संबंधिचे अधिकार राज्याला द्यावे अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यानी १० ऑगस्ट रोजी लोकसभेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मराठा आणि धनगर समाजाची राज्यातील अवस्था बिकट आहे. आज ५० टक्के मराठा समाज भूमिहीन आहे. पोटभरण्यासाठी स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे या समजाला आरक्षणाची गरज आहे. सोबतच धनगर समाजाचीही आरक्षणाची जुनी मागणी असून या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी अथवा या संबंधिचे अधिकार राज्याला द्यावे अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यानी १० ऑगस्ट रोजी लोकसभेत केली.१२७ व्या घटनादुरुस्ती संशोधन विधेयकाबाबत खा. प्रतापराव जाधव यांनी चर्चेत भाग घेत त्यांची या मुद्द्यावरील भूमिका मांडली. पुढे बोलताना ते म्हणाले देशातील राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची मागणी असलेले आरक्षण देण्याचा अधिकार या विधेयकामुळे त्या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. गुजरातमध्ये पटेल समाज, राजस्थान मध्ये गुर्जर व हरियाणामध्ये जाट समाज व इतर राज्यांमध्ये वेगळे समाजासाठी आरक्षणाबाबत आंदोलनं सुरू आहेत. आता जर राज्यांना हे अधिकार मिळाले आणि त्यांनी जर कोणाला ओबीसी मध्ये, कोणाला एससी, कोणाला एसटीमध्ये समाविष्ट केलं तर पूर्वीचाच राज्यांचा आरक्षणाचा कोटा पन्नास टक्क्यांचा पूर्ण झालेला आहे. आता त्यात आणखी संख्या वाढली तर या कोट्याच्या बाहेर तो आकडा जाईल. त्यामुळे आरक्षण कसे मिळेल, हा प्रश्न आहे. परिणामी या विधेयकामुळे राज्या-राज्यात समाजा -समाजामध्ये वाद वाढून आणखी असंतोष उफाळून येईल अशी शक्यता आहे. केंद्राने राज्यांना समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार या विधेयकाने दिले आहे. पण जी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आहे, ती लोकसंख्येच्या अनुरूप वाढवून देण्याची कार्यवाही झाली अथवा तशा प्रकारचे संशोधन या बिलामध्ये केलं तर शंभर टक्के या बिलाला पाठिंबा राहील असेही खासदार प्रतापराव जाधव याप्रसंगी म्हणाले.तत्कालीन महाराष्ट्रातील भाजपच्या राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं. आजही आमचे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरकार आरक्षण द्यायला तयार आहे. पण जर ५० टक्क्यांच्या वर असलेला कोटा १६ टक्क्यांनी वाढवून मिळाला तर मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि आणखी ५ टक्के कोटा वाढवून मिळाला तर धनगर समाजालाही आरक्षणाचा लाभ देता येऊ शकेल असे त्यांनी बोलतांना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधवreservationआरक्षण