शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यांच्यावर वाढवा- प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 10:55 IST

Prataprao Jadhav on Reservation : ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी अथवा या संबंधिचे अधिकार राज्याला द्यावे अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यानी १० ऑगस्ट रोजी लोकसभेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मराठा आणि धनगर समाजाची राज्यातील अवस्था बिकट आहे. आज ५० टक्के मराठा समाज भूमिहीन आहे. पोटभरण्यासाठी स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे या समजाला आरक्षणाची गरज आहे. सोबतच धनगर समाजाचीही आरक्षणाची जुनी मागणी असून या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी अथवा या संबंधिचे अधिकार राज्याला द्यावे अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यानी १० ऑगस्ट रोजी लोकसभेत केली.१२७ व्या घटनादुरुस्ती संशोधन विधेयकाबाबत खा. प्रतापराव जाधव यांनी चर्चेत भाग घेत त्यांची या मुद्द्यावरील भूमिका मांडली. पुढे बोलताना ते म्हणाले देशातील राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची मागणी असलेले आरक्षण देण्याचा अधिकार या विधेयकामुळे त्या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. गुजरातमध्ये पटेल समाज, राजस्थान मध्ये गुर्जर व हरियाणामध्ये जाट समाज व इतर राज्यांमध्ये वेगळे समाजासाठी आरक्षणाबाबत आंदोलनं सुरू आहेत. आता जर राज्यांना हे अधिकार मिळाले आणि त्यांनी जर कोणाला ओबीसी मध्ये, कोणाला एससी, कोणाला एसटीमध्ये समाविष्ट केलं तर पूर्वीचाच राज्यांचा आरक्षणाचा कोटा पन्नास टक्क्यांचा पूर्ण झालेला आहे. आता त्यात आणखी संख्या वाढली तर या कोट्याच्या बाहेर तो आकडा जाईल. त्यामुळे आरक्षण कसे मिळेल, हा प्रश्न आहे. परिणामी या विधेयकामुळे राज्या-राज्यात समाजा -समाजामध्ये वाद वाढून आणखी असंतोष उफाळून येईल अशी शक्यता आहे. केंद्राने राज्यांना समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार या विधेयकाने दिले आहे. पण जी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आहे, ती लोकसंख्येच्या अनुरूप वाढवून देण्याची कार्यवाही झाली अथवा तशा प्रकारचे संशोधन या बिलामध्ये केलं तर शंभर टक्के या बिलाला पाठिंबा राहील असेही खासदार प्रतापराव जाधव याप्रसंगी म्हणाले.तत्कालीन महाराष्ट्रातील भाजपच्या राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं. आजही आमचे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरकार आरक्षण द्यायला तयार आहे. पण जर ५० टक्क्यांच्या वर असलेला कोटा १६ टक्क्यांनी वाढवून मिळाला तर मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि आणखी ५ टक्के कोटा वाढवून मिळाला तर धनगर समाजालाही आरक्षणाचा लाभ देता येऊ शकेल असे त्यांनी बोलतांना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधवreservationआरक्षण