शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

यश हवे असेल, तर गरीब, खेड्यातील असल्याचा न्युनगंड दूर करा : विशाल नरवाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 18:01 IST

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ९१ वा तसेच ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावणाºया विशाल नरवाडे यांच्याशी साधलेला संवाद

- संदीप वानखडे बुलडाणा : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत तर आवश्यक आहेच. त्याहीपेक्षा आपण गरीब आहोत..खेड्यातील आहोत, असा न्यूनगंड बाळगणे आधी दूर केले पाहिजे, असा मोलाचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ९१ वा तसेच ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावणाºया विशाल नरवाडे यांनी दिला आहे.  आयपीएससाठी निवड होवूनही त्यांनी परिश्रम घेत आयएएसचे यशोशिखर गाठले.  त्यांच्याशी साधलेला संवाद. 

आयएएसपर्यंतचा प्रवास कसा होता?माजे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सावळी येथे झाले. दहावीपर्यंत नवोदय विद्यालय शेगाव येथे शिक्षण घेल्यानंतर ११ वी व १२ वीचे शिक्षण लातूर येथे केले. त्यानंतर अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती.

आयपीएस असतानाही आयएसएस होण्याचा विचार कसा आला?युपीएससी परीक्षेची तयारी केल्यानंतर मला तिसºया प्रयत्नात यश आले. माझी आयपीएससाठी निवड झाल्यानंतर पंश्चिम बंगालमध्ये सेवा देत आहे. सेवा देत असताना जिल्हाधिकारी जे सामाजिक कार्य करू शकतात ते आयपीएसला शक्य नाही. त्यामुळे मी आणखी अभ्यास सुरू केला आणि सहाव्या प्रयत्नात मी आयएएस झालो. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी; तसेच ज्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत त्या सोडविण्यासाठीच आयएएस व्हायचा निर्धार केला. 

आयएसएसची तयारी कशी केली?  अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मी युपीएससीची तयारी सुरू केली. तुम्ही किती तास अभ्यास करता याला महत्त्व नाही तर मनापासून किती करता याला महत्त्व आहे. त्यामुळे १६ ते १८ तास अभ्यास केला तरच यश मिळते असे काही नसते. मी मनापासून आठ ते दहा तासच अभ्यास केला. माझी तिसºया प्रयत्नाच आयपीएससाठी निवड झाली. त्यानंतर माझी आयआरएससाठीही निवड झाली होती. परंतु, मला आयएएसच व्हायचे असल्याने ती मी नाकारली. परीश्रमाच्या बळावर मी आज ओबीसी प्रवर्गात महाराष्ट राज्यात प्रथम आहे. 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? सध्या अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. मात्र त्यातील बहुतांश विद्यार्थी सोशल मिडीयाच्या आहारी गेलेले असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावर वेळ व्यर्थ न घालवता अभ्यासात घालवावा. आठ ते दहा तास अभ्यास केल्यावरही यश मिळतेच. गरीबी, ग्रामीण भागातील असल्यामुळे यश मिळणार नाही, असा विचार विद्यार्थ्यांनी आधी काढून टाकावा. सकारात्मक विचार करून युपीएससीची तयारी केल्यास यश हमखास मिळतेच. 

 काय करायचे त्याचबरोबर काय नाही करायचे हे ठरवणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित करून त्यानुसार परीश्रम घेतल्यास यश निश्चितच मिळते. गरीब, ग्रामीण भागातील विद्यार्थी आयएएसपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे, परिश्रम घेतल्यास यश मिळतेच.  ग्रामीण भागातील असल्याचा न्युनगंड बाळगू नका. परिश्रम मनापासून केल्यास यश निश्चितच मिळते. त्यामुळे परिश्रम करा.- विशाल नरवाडे

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रinterviewमुलाखत