शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

१५ वर्षात कामे केली असती तर दुष्काळ हटला असता :  सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:39 IST

बुलडाणा: सत्तेत असताना गेल्या १५ वर्षात कामे केली असती तर राज्यातील दुष्काळ हटला असता असा खोचक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.

ठळक मुद्देचिखलीतील एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले असता राज्यात दुष्काळ सदृश्य नव्हे तर दुष्काळच असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यानुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांनी उपरोक्त वक्तव्य केले. चारा व पाण्याच्या नियोजनालाही महत्त्व दिले जावे, असेही त्यांनी शेवटी अधोरेखीत केले.

बुलडाणा: सत्तेत असताना गेल्या १५ वर्षात कामे केली असती तर राज्यातील दुष्काळ हटला असता असा खोचक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. दोन दिवसापूर्वी चिखलीतील एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले असता राज्यात दुष्काळ सदृश्य नव्हे तर दुष्काळच असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यानुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांनी उपरोक्त वक्तव्य केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपेच आ. डॉ. संजय कुटे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये शनिवारी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.दुष्काळ सदृश्य स्थितीची तालुका निहाय पहाणी करण्यासाठी खोत दोन दिवसापासून जिल्ह्यात तळ ठोकून होते. शनिवारी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईसदृश्य स्थितीबाबत आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपरोक्त वक्तव्य केले. दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकार शब्दांचा खेळ करीत असून शरद पवारांनी दुष्काळ सदृश्य नव्हे तर दुष्काळच असल्याचे वक्तव्य केल्याबाबत त्यांना विचारणा केली होती. त्यानुषंगाने ते बोलत होते. सध्याच्या दुष्काळ सदृश्यस्थितीत एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा हातात हात घालून दुष्काळाचा सामना करण्यास प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी बोलताना प्रतिपादीत केली. आपल्या सारख्या सामान्य माणसाने शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही. ते जेष्ठ नेते आहेत. शासन, प्रशासनाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याचे नियम व अटी त्यांना माहित आहे. दुष्काळ कधी जाहीर करावा लागतो, याचीही त्यांना कल्पना आहे. १५ वर्षामध्ये योग्य काम झाले असते तर बर्यापैकी राज्यातील दुष्काळ हटला असता असे ते शेवटी म्हणाले. दरम्यान, आपण आतापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्हयांचा दुष्काळ सदृश्य स्थिती पाहता दौरा केला आहे. सोबतच शक्य होईल तेवढ्या भागाचा दौरा करून सविस्त माहिती संकलीत करत असल्याचेही कृषी राज्यमंत्री खोत यावेळी बोलताना म्हणाले. १९७२ प्रमाणेच दुष्काळाची स्थिती बुलडाणा जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर १९७२ प्रमाणेच हा दुष्काळ असल्याचे आपणास वाटत आहे. अन्न धान्यासोबतच पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य भासणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यानुषंगाने पूर्व तयारी ठेवावी, असे ते म्हणाले. चारा व पाण्याच्या नियोजनालाही महत्त्व दिले जावे, असेही त्यांनी शेवटी अधोरेखीत केले. बुलडाणा जिल्ह्यात केलेल्या पाहणीदरम्यान आपले निरीक्षण काय? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी उपरोक्त बाब अधोरेखीत केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSadabhau Khotसदाभाउ खोत Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळ