शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

शेतकर्‍यांना १५ दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास मंत्र्यांना गावबंदी - तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:30 AM

चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्नोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.

ठळक मुद्देगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्नोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.चिखली तालुक्यातील गोदरी येथे काल ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत ते बोलत होते, यावेळी रविकांत तुपकर यांच्या हस्ते गोदरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाम फलकाचे उद्घाटन झाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांचे गोदरी गावात आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गावकर्‍यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, शासनाने सुरुवातीला सोयाबीनचे भाव पाडल्याने शेतकर्‍यांना मातीमोल भावाने आपले सोयाबीन विकावे लागले. दुसरीकडे मराठवाडा व विदर्भातील कपाशीवर बोंडअळी पडल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, सरकारने या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. मात्न हे सरकार जोपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे टाकत नाही, तोपर्यंत ‘‘सरकारचे हे लबाडाचे आवतन’’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच नाफेड योजना शेतकर्‍यांसाठी नसून भाजपच्या दलालांसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतीमालाला हमीभाव व उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याची घोषणा केली; मात्न सरकारने आधी दीडपट हमी भाव व उत्पादन खर्चाची व्याख्या स्पष्ट करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले; तसेच गोदरी येथील गावकर्‍यांनी माझ्यावर व माझ्या चळवळीवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे.     यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, भगवानराव मोरे, बबनराव चेके, राणा चंदण, संजय इंगळे, सतीश मोरे, मयूर बोर्डे, अजीम, नितीन राजपूत, अनिल वाकोडे, गणेश शिंगणे, गोदरीच्या सरपंच लक्ष्मीबाई शेळके, उपसरपंच अभिमन्यु कर्‍हाडे, भागवत म्हस्के, राम अंभोरे, साजीद, संतोष परिहार, राजू मोरे, सरदारसिंग राजपूत, नवलसिंग राजपूत, छोटु झगरे, रामेश्‍वर परिहार, अमोल मोरे, नवृत्ती शेवाळे, प्रवीण राऊत, डॉ.जंजाळ, राहुल साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना