शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

दमदार पावसाने येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 13:15 IST

बुलडाणा : आठवड्यापासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आठवड्यापासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे येळगाव धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात सतत पाऊस झाल्याने पाच दिवसात पैनगंगा नदीला चार वेळेस पूर आला. धरण पुर्ण भरल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बुलडाणेकरांची भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.बुलडाणा शहरासह परिसरातील गावाला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. धरणाची पाणी साठवण क्षमता १२.४० दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात पाऊस झाला की, धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होते. २६ जूनच्या रात्री बुलडाणा तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने पैनगंगेला पूर आला. साखळी बु.मंडळात ८३ मिमी, धाड ८१ मिमी , देऊळघाट ७३ तर म्हसला बु. मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. अंभोडा, उमाळी, हतेडी खुर्द, कोलवड, सागवन, दुधा, देवपूर, देऊळघाट, धाड, बोरखेड, साखळी बु., साखळी खुर्द, अंत्री तेली गाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले. मात्र मुसळधार पावसाने येळगाव धरण १०० टक्के भरले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र बुलडाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाही. तर यावर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येळगाव धरण १०० टक्के भरल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. बुलडाणेकरांना दरडोई १०० लीटर याप्रमाणे दररोज ७० लाख लीटर पाणी लागते. परिसरातील गावांनाही येळगाव धरणातूनच पाणीपुरवठा होतो. येळगाव धरणातून प्रतिदिन ९० लाख लीटर पाण्याची उचल होते. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी येळगाव धरणातील गाळ काढण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढली. काढलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकल्याने परिसरातील शेताची सुपिकता वाढली.आजूबाजूच्या गावांची भागणार तहानयेळगाव धरणातून अजिसपूर, नांद्राकोळी, साखळी बु., सागवन, कोलवड, देऊळघाट, बिरसिंगपूर, येळगाव, सुंदरखेड, भादोला, माळविहिर, अंत्री तेली, जांभरुणला येळगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. ऐन उन्हाळ्यात व दुष्काळी परिस्थिती असतांनाही येळगाव धरणामुळे या गावांची तहान भागविली गेली. यावर्षी जूनमध्येच धरण १०० टक्के भरल्याने या गावातील नागरिकांची वर्षभर तहान भागविली जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण