शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

बुलडाण्यात पावसाची संततधार; जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 2:51 PM

पावसाच्या वार्षिक सरासरीमध्ये सहा टक्कयांनी वाढ होऊन ही सरासरी ६४.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या २४ तासात जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमधील जलसाठ्यात तब्बल आठ टक्यांनी वाढ होऊन त्याची टक्केवारीही २५.१६ टक्क्यांवर पोहोचली आहे. दरम्यान, मध्यप्रदेशात होत असलेल्या दमदार पावसामुळे वान प्रकल्प भरण्याच्या मार्गावर असून या प्रकल्पाचे सहा दरवाजे अर्ध्याफुटापर्यंत उघडण्यात आले असून त्यातून ६००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे.दरम्यान, विदर्भ मराठवाड्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या धामणा नदीलाही पुर आल्याने सातगाव म्हसला येथील पुल पाण्याखाली गेला असून त्यामुळे धाड-औरंगाबाद या मार्गावरील वाहतूक दुपारी ठप्प झाली होती तर पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पळसखेड नागो नजीकचा अस्थायी पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूकही बंद झाली.

दुसरीकडे या संततधार पावसामुळे २४ तासातच पावसाच्या वार्षिक सरासरीमध्ये सहा टक्कयांनी वाढ होऊन ही सरासरी ६४.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे संग्रामपूर तालुका येत्या काही दिवसात पावसाची वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता असून या पावसामुळे या तालुक्यातील वार्षिक सरासरी ही ९२.१० टक्क्यांवर पोहोचली आहे. बुलडाणा तालुक्याचीही पावसाची सरासरी ही ८२.०८ टक्क्यांवर पोहोचली आहे तर शेगाव तालुक्याची सरासरी ही ८० टक्के झाली आहे. दरम्यान, संततधार पडणारा हा पाऊस जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पडत आहे. देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात या पावसाचा जोर कमी आहे. या दोनही तालुक्यात अनुक्रमे आठ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात सरासरी ७.६ आणि ८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दोन्ही तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या अनुक्रमे ३७.४८ आणि ५३.६३ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. लोणार तालुक्यातही अशीच काहीशी स्थिती असून येथे वार्षिक सरासरीच्या ४७.२४ टक्के पाऊस पडला आहे. हे तीनही तालुके वगळता अन्य तालुक्यात मात्र पाऊस दमदार पडत आहे.या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये २४ तासातच आठ टक्यांनी वाढ झाली असून वर्तमान स्थितीत १३४.२७ दलघमी पाणीसाठा प्रकल्पांमध्ये झाला आहे. मोठ्या प्रकल्पापैकी नळगंगा प्रकल्पामध्येही पाच टक्के, पेनटाकळी प्रकल्पामध्ये १४ टक्के वाढ झाली आहे.आता प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढण्यास या पावसामुळे मदत होत असून जिल्हयात गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात सरासरी २५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून मोठ्या प्रकल्पांपैकी पेनटकाळी प्रकल्प, ज्ञानगंगा आणि मस प्रकल्पांमध्ये जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. खामगाव, चिखली आणि मेहकर शहरांसाठीच्या उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने दिलासादायक म्हणावी लागले. लघु प्रकल्पांपैकी करडी, मातला, केसापूर, झरी, दहीद, वरवंड येथील प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस